शुद्ध ४ मंगळवारीं भांबोडाची खंडणी त्रिंबकराऊ विश्वनाथ याणी केली. अताराकडे इनामगांव होते. त्याणें शंभर वसूल घेतला होता, तो वजा दिल्हा. सन ११५९ ची खंडणी केली. गांव दरोबस्त आपल्याकडे घेतला. अताराकडील मामला दूर केला. रामराजियाचा हातरोखा घेतला आहे ह्मणतात. त्याजवर सन ११५८, ५७५; सन १ १५९, ६३७॥; खंडणी केली. शंभर रु॥ मजुरा दिल्हे. कतबियांत तेरीख पंधरावी जमादिलाखर घातली असे.
आषाढ शुद्ध १३ सह १४ शुक्रवारी
सिंहगड सचिवाकडून पेशवियां- आपल्या मळ्याच्या दक्षणेस
कडे आला. सलुखें आला. राज- खंडोजी भोंडवियाने दिडाशी रुप-
श्रीनीं व ताराबाईनी सचिवास आज्ञा यांस पंधरा बिघे जमीन आपले
करून देविला असे. १ मिराशीपैकीं, आपल्या वाट्यापैकीं,
दिल्ही. ते आजि मोजून दिल्ही.
त्याणें व त्याचे बायकोनें मेजून
दिल्ली. पुत्रहि त्यांचा जवळ होता.
श्रावण शुद्ध ४ गुरुवारीं श्रीमंत बाळाजी बाजीराऊ यांणीं सोनियाचें तेहतिश्या तोळियांचे ब्रह्मांडदान द्यावयास करून दान दिल्हें. महा दान केलें. १
रोजमजकुरी खंडो रघुनाथ, गु॥ चौ। पुणें, यास देवआज्ञा जाली. अडचा प्रहरा सव्वादोन प्रहरा वारले. चांगले मरण आलें. पाहिले दिवशीं वागवाग होते. शीत जालें. दुसरे रोजी वारले असेत. १
श्रावण शुद्ध ८ सोमवारी रात रघोजी भोंसले श्रीमंताकडे आले. हे सामोरे जाऊन घेऊन आले असेत.
रोज मजकुरीं विश्वासरायाच्या लग्नाची वस्त्रें पुणेकरांस दिल्हीं असेत. बि॥ याद. ( पुढें कोरें )
श्रावण शुद्ध १२ शुक्रवारी मौजे घोरपडी ता। हवेली येथें गोविंद बल्लाळ बुंदेलखंडे याजला बाग करावयास श्रीमंतांनीं जमीन पंधरा बिघे पांच होत पांच मुठी या पांडानें देविली ती दिल्ही. हवलदार व जमीदार व पाटील एक होऊन दिल्ही, ता। बाबूराऊ त्याचा भाऊ. १