Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

प्रस्तावना 

तेथे सिद्दीसात याणें स्वामीच्या गावांत अतोनात उपद्रव चालविला होता (पा. ब्र. च. पृ. २७). तो सहन न होऊन स्वामीनें आपली चीजवस्तू व कारकून मंडळी देशावर पाठवून दिली. आपण स्वतः पुढें काहीं महिन्यांनी घांटावर आला. १७२८ च्या पावसाळ्यात समाधीस कोंकणात जाऊन पुन्हा स्वामी लवकरच देशावर आला. १७२९ च्या जूनांतही स्वामी कोंकणात गेला होता. त्यावेळी स्वामीची व कान्होजीची शेवटची गांठ पडली. १७२६ त ज्या पालगडाखालीं हबशाशीं युद्ध सुरूं झालें, तो पालगड १७२९ त मरतां मरतां कान्होजीस प्राप्त झाला (पा. ब्र. ले. ३२८). हा किल्ला कान्होजीस आपल्या आशीरवादानें मिळाला अशी ब्रह्मेंद्रानें आपली समजूत करून घेतलीं. आशीरवादाव्यतिरित वाचिक मदतीखेरीज किल्ला मिळवून देण्याच्या कामीं इतर कोणतीहि मदत स्वामीनें केल्याचें दिसत नाहीं. उलट शाहू महाराज व बाजीराव पेशवे ह्यांच्या मनांत आंग्र्याविषयीं विकल्प भरवून देण्याची मात्र खटपट परमहंसांनी केली होती हें स्पष्ट आहे. १७२९ तील जूनांत ब्रह्मेंद्राची व कान्होजीची जी भेट झाली, तींत स्वामीच्या कर्जाचा हवाला कान्होजीनें जयसिंग, आंग्र्यावर म्हणजे सेखोजी आंग्र्यावर दिला (खंड ३, लेखांक २९४). सेखोजी आंग्रे, हा सरदार आपल्या बाष्पाप्रमाणेच शूर असून कर्तृत्चाची आवडहि त्याच्या अंगीं सामान्य नव्हती. भारदस्तपणा व शालीनता हे दोन गुण सेखोजीच्या ठायीं विशेष होते. सेखोजीचा सख्खा भाऊ सभाजी हा जातीचा हूड असून, वडिलांशीं भक्तिहीन, बरोबरीच्यांशीं तुसड व कनिष्ठांशीं मगरूर रहाण्यांत त्याला विशेष गोडी वाटत असे. कान्होजीच्या मरणोत्तर सेखोजीस सरखेली मिळाली. ह्याचें वैषम्य वाटून संभाजी रुसून सुवर्णदुर्गास निघून गेला. ही बातमी ब्रह्मेंद्रास कळल्याबरोबर त्याने आपल्या कपटनाटकास सुरुवात केली. दोघांचेहि गोमटें व्हावें, चांगलें व्हावे, अशी आपली इच्छा आहे, असें सेखोजीस लिहून, संभाजीच्या मनांत सेखोजींविषयीं वाकडे भरविण्याचा स्वामीने प्रयत्न केला. १७२९ च्या जुलईत कान्होजी वारल्यावर, मोगलांशी व शामळाशीं लढाई सुरू असता, कोल्हापूरच्या संभाजीवर शाहूनें १७२९ च्या हिवाळ्यांत स्वारी केली व सेखोजींस पन्हाळ्याखाली (शाहूमहाराजाची रोजनिशी, रकाना ४२) आणि संभाजीस विशालगडाखाली चौक्या बसविण्यास सांगितले. (रोजनिशी, रकाना, ४७). महाराजांचा हुकूम दोघांनीही अंमलांत आणिला. परंतु शाहूराजाचा हुकूम अंमलांत आणतांना, सेखोजी व संभाजी हे दोघे बंधू एकजुटीने न वागतां विभक्तपणें आपापली कामगिरी बजावीत आहेत. असे ब्रह्मेंद्रासारख्या बारीक पहाणा-यांच्या दृष्टोत्पत्तांस आलें. सेखोजीला सरखेल हा किताब होता, ह्यांचे वैषम्य वाटून संभाजीने आपल्या नावाचा एक नवीन शिका काढिला. अंतस्थ व बहिस्थ शत्रूंना जिंकून आपला उत्तरोत्तर उत्कर्ष होत जाणार अशा अर्थाचा हा शिका होता. नवीन शिका काढण्याची ही बुद्धि संभाजीला ब्रह्मेंद्रस्वामीचे हस्तक दत्ताजी कनोजे व बकाजी नाईक ह्यांनी सुचविली असावी असा अंदाज आहे. वडील भाऊ, सेखोजी मराठ्यांच्या सर्व आरमाराचा अधिपति असतांना संभाजी आपल्याला आरमाराचा सरसुभेदार म्हणवूं लागला व कुलाब्याच्या दक्षिणेस सुवर्णदुर्गास मुख्य ठाणें करून राहण्यांत त्याला विशेष अभिमान वाटला (खंड ३, लेखांक २६७). १७३१ च्या फेब्रुवारींत संभाजी महाराज कोल्हापूरकर व शाहूमहाराज सातारकर ह्यांची क-हाडाजवळ जखीणवाडीस मुलाखत होऊन तह झाल्यावर, सेखोजीस व संभाजीस छत्रपतीनीं साता-यास बोलाविलें (रोजनिशी १४१). ह्या दोघा भावांमधील वैमनस्य मोडून टाकावें, असा ह्या बोलावण्यांत छत्रपतींचा हेतु होता. परंतु बंधुविरोधाचा इतका कांही कळस झाला होता कीं सेखोजीस व संभाजीस एकदम साता-यास येणे अशक्य झालें. संभाजी तह होण्याच्या सुमाराला १७३१ त व सेखोजी १७३२ च्या मार्चात परस्परे सातान्यास गेले. (रोजनिशी १४० व लेखांक २५२). दोघे बंधु एकदम साता-यास न जाण्याचें कारण ब्रह्मेंद्रस्वामीच होता. दत्ताजी कनोजे नामेंकरून कोणी मनुष्य ब्रह्मेंद्रस्वामीच्या प्रीतीतील होता. बेकायदा आगळीक केल्यावरून व संभाजीच्या तर्फे सेखोजीविरुद्ध फितूर केल्यावरून, सेखोजीने त्या दत्ताजी कनोजास नोकरीवरून दूर केलें.