Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

प्रस्तावना 

७ हे हlत्तीचें प्रकरण १७२७ च्या फेब्रुवारींत घडलें. स्वामी १७२८ च्या मार्चात धावडशीस जो आला तो बहुतेक कायमचा आला ह्यापूर्वी बरींच वर्षे स्वामी धावडशीस येऊनजाऊन होता. १७१७ च्या जानेवारींत व १७१६ च्या हिवाळ्यात स्वामी देशावर होता (पा ब्र लेखांक ११४). १७२१ पासून १७२५ पर्यंत बहुतेक प्रत्येक वर्षी स्वामी देशावर येत असे (खंड ३, लेखांक १७, १८) लिंब येथील विहिरीचे काम १७२१ पासून १७२५ पर्यंत चालले असतांना विरुबाईनें ब्रह्मेंद्रापाशीं पाथरवटांची मागणी केलेली आहे. १७१६ त देशावर आल्यावर बाळाजी विश्वनाथानें ब्रह्मेंद्रास पिंपरी हें गाव इनाम दिलें. ब्रह्मेद्र स्वामीच्या बखरींत पिंपरी हे गांव बाळाजी विश्वनाथानें ब्रह्मेंद्रास सन सीत अशरीनांत दिले म्हणनू जें म्हटले आहे, (ब्र. ब. पृ. १३) तें चूक आहे. सीत अशरीन ह्या अक्षरांबद्दल सीत अशर अशी अक्षरे हवीं आहेत. सीत अशर सालांत म्हणजे १७१६ च्या हिवाळ्यांत ब्रह्मेंद्र क्रघांटीं आला होता. हे पारसनीसकृत ब्रह्मेंद्र स्वामीच्या पत्रव्यवहारांतील लेखांक ११४ त टीप ह्यावरून उघड आहे. येसशेट सोनाराने ४१ मोहरांची पारख सबा अशरच्या १८ जमादिलाखरीं म्हणजे १७१७ च्या एप्रिलात केली. ह्या ४१ मोहरांचा हवाला बाजीरावानें वाडीच्या म्हणजे नरसोबाच्या वाडीच्या मुक्कामी बाळाजी विश्वनाथापासून घेतला . बाळाजी विश्वनाथ त्यावेळीं कोल्हापूरकरांच्या विरुद्ध त्या प्रांतीं लढत होता. तेथे ब्रह्मेद्राची व त्याची गांठ पडून ब्रह्मेंद्रानें आपली भिक्षा वाडीस बाळाजी विश्वनाथाच्या स्वाधीन केली. ११४ पत्राच्या टीपेंत रा. पारसनीस सबा अशारीन ज्यास म्हणतात, तें खरोखर सबा अशर साल होय. तसेंच सीत अशरीनांतील ताकीदपत्रांवरून पिंपरी हें गाव त्याच समयास स्वामींस मिळालें, अशी पारसनीसाची समजूत आहे. (पा. ब्र. च. पृ. १८). परंतु ती सर्वस्वी चुकीची आहे. शिवाय सीत अशरीनचा २९ मोहरम व राजशक ५२ ची भाद्रपद बहुल १३ पारसनीस म्हणतात त्याप्रमाणें इ. सन १७२६ त पडत नसून १७२५ च्या २८ सप्टंबर व २६ ऑगस्ट ह्या तारखांस प्रत्येकीं पडते बाळाजी विश्वनाथाकडून पिंपरी गाव मिळाल्यानंतर १७२१ त शाहूनें स्वामीस धावडशी गांव इनाम दिले. तेथें असतांना विरुबाईनें ब्रह्मेंद्रापाशीं पाथरवट मागितले (खंड ३, लेखांक १७, १८). १७२८ च्या मार्चात धावडशीस आल्यावर स्वामीनें आपलीं दुःखें शाहूमहाराजांस सांगितलीं. शिवाय स्वामीच्या सकटांचा वृत्तांत बाजीरावास परस्परें कळलाच होता. (पा. ब्र. च. पृ. ३०) आपल्या परमपूज्य गुरूचीं गा-हार्णी ऐकून त्यांचा परिहार करण्याची इच्छा दोघांची होती. परंतु कान्होजी जिवंत असे तोपर्यंत आंग्र्याला तंबी पोहोचण्याचा सभव फारच थोडा होता. स्वामीचा छल आंग्र्याने इतका दुरून, अप्रत्यक्ष रीतीने व चतुराईनें केला होता कीं, त्याला राजरोस रीतीनें नांवे ठेवण्यास बिलकुल जागा नव्हतीं. स्वामीजवळ परवाना नसल्यामुळें हत्ती अडकावून ठेवणें लढाईच्या नियमांना सर्वस्वीं अनुसरूनच होतें. आपला हत्ती आंग्र्यानें अडविला म्हणून स्वामीच्या देवालयाची व गांवाची राखरांगोळी करणें मात्र हबशाला केव्हांहि शोभण्यासारखे नव्हतें. हिंदूंच्या धर्माची व त्यांच्या धर्मगुरूचीं अशी मानखंडणा शाहू महाराजासारख्या राजाला व बाजीरावासारख्या लढवय्याला बिलकूल खपण्यासारखी नव्हती. तेव्हा हबशाशी लढाई करून गोब्राह्मणांचा प्रतिपाल करण्यास शाहूला व बाजीरावांला ही सबब उत्तम सांपडली. अर्थात १७२६ त जें युद्ध सुरूं झालें होतें, तें १७२८ त शाहूनें तसेंच चालूं ठेविलें. इकडे ब्रह्मेंद्रस्वामी १७२८ च्या पावसाळ्यांत समाधिप्रीत्यर्थ कोंकणात उतरला.