[३९७] श्री. २७ जून १७४२.
पुरवणी राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी:-
+++++++ मल्हारजीनें छावणी अंतर्वेदीत केली. राजश्री राम दीक्षित तिलक सैन्यांत आहेत. गोविंद नाईक आले त्यांनीं सांगितलें व पत्रें साहूकारांचीं येतात. मल्हारजीचे चित्तांत कीं, मशीद, विश्वेश्वराची ज्ञानवापीजवळी ते, पाडून देवालय करावें. परंतु पंचद्राविडी ब्राह्मण चिंता करितात कीं, हे मशीद प्रसिध्द आहे. पातशहाचा हुकूम नसतां पाटील देऊळ करील. एखादा पातशहा दुष्ट जाला ह्मणजे ब्राह्मणांस मरण येईल. जीवच घेईल. यवन प्रबळ या प्रांतीं विशेष आहेत. सर्वांचे चित्तास येत नाहीं. दुसरे जागा बांधिलें तरी बरें आहे. ब्राह्मण चिंता करितात. ++++++++ ब्राह्मणांची तरी दुर्दशा होईल. गंगा समर्थ. काशींत ब्राह्मण चिंता करितात. मना करीसा कोणी नाहीं. मना करावें तरी पाप कीं, देवाची स्थापना मना करावी हा दोष. परंतु ब्राह्मणां संकट न पडे तें करावें हें पुण्य विशेष. याजवर विश्वेश्वराचे चित्तांत येईल तें करील. चिंता करून काय होणे ? याजवर मशीद पाडूं लागतील तेव्हां सर्व ब्राह्मण मिळतील, आणि श्रीमंतांस विनंतिपत्र पाठवितील. ऐसा विचार जाला आहे. वर्तमान श्रवण केलें तें सेवेसीं लिहिलें. इ० इ० इ० मिति आषाढ शुध्द ६. हे विज्ञापना.