[३२८] श्रीभार्गवराम. १ जुलै १७२९.
राजश्री चिमणाजी पंत दि॥ श्री स्वामी यांसी :-
प्रति संतुबाई मु॥ जंजिरें सुवर्णदुर्ग दंडवत उपरी येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लेखन करीत जाणें. विशेष. श्रीमत् परमहंसबावा स्वामी जंजिरे मजकुरी आले होते, ते समयीं धावडशीस तुह्मांकडे जिन्नस रवाना करावयाची आज्ञा केली होती. त्याजप्रमाणे येथून, बराबर नारोबल्लाळ, सामान येणेप्रमाणें :-
सदरहूप्रमाणें सामान पा। असे. ते जामा पोंहचलि यानंतर पावलियाचें उत्तर याजबराबर लेहून पाठवणें. श्री बावास्वामी राजपुरीहून कुलाबां जावयास निघाले ते राजपुरीहून इतकें रोजांत कुलाबांत गेले असतील. वरकड अधिकोत्तर लिहिजेसें नाहीं. रा॥ छ २८ माहे सफर.
लेखनसीमा.