[३२१] श्री.
राजश्री जंगन्नाथपंत गोसावी यांसी :-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित मानाजी आंगरे वजारत माब रामराम उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहिलें पाहिजे. विशेष. पत्र पाठविलें प्रविष्ट होऊन वर्तमान कळलें. समाधीच्या साहित्यांविषयीं लिहिलें. ऐशास, यांजपेक्षां अधिकोत्तर जोड कोणती आहे ? तुह्मी लिहून पाठविले यानंतर अनुकूल करावें, नाहीं तरीं न करावें, ऐसें नाहीं. समाधीस्थित बावाचें चिंतन निरंतर आहे. तद्नुरूप निष्टेनुरूप भजनापेक्षां श्रेयस्कर मानीतच नाहीं. प्रस्तुतकाळी कितेक प्रसंग अनुकूल प्रतिकूळतेचा आहे, तो राहू पावणार नाहींच. त्याप्रमाणें समयीं पाठवावयाचेंही अंतर होणार नाहींच. प्रस्तुत अनुकूल पडिल्याप्रमाणें जिन्नस रवाना केला आहे. याददास्त अलाहिदा असे त्याप्रमाणें पावलियाचें उत्तर पाठवावें. दस्तकाचे ऐवजी पैकेयाचा पर्याय लिहिला. ऐशास, सलाबाजप्रमाणें दस्तकें पावत असतात त्याप्रमाणेंच पाठविलीं असेल. तरवारेचे अनुकूल तुह्मां योग्य जाहली, पाठविली जाईल. येणें दारांसमागमें क्षेम कुशल लिहीत जावें. रा. छ. १९ माहे रबिलावल. बहुत काय लिहिणें.
मोर्तबसूद