[२५५] श्री. १६ एप्रिल १७३५.
श्रीमत् सकलतीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी.
अपत्यें सेखोजी आंगरे सरखेल दंडवत विनंति येथील कुशल तागाईत वैशाख शुध्द पंचमी सौम्यवासरपर्यंत स्वामीचे आशीर्वादें सुखरूप जाणोन स्वकीय लेखन करावयासी आज्ञा केली पाहिजे. विशेष स्वामीनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोषावाप्ती जाहाली. ऐसेंच आशीर्वादपत्रीं संतोषवीत गेलें पाहिजे. यानंतर स्वामीची आज्ञा घेऊन स्वार जाहालों ते मजल दरमजल शुध्द द्वितीयेस पुण्यास आलों. शितोळयाकडील सोइरीक नेमस्त केली आहे. तें लग्न उरकोन कुलाबां जावें. त्यास चिरंजीव राजश्री संभाजी आंगरे यांची नवरी वऱ्हाडेदेखील काळोसास आली. तें लग्न आधीं करावें लागतें. एदंनिमित्यें या लग्नाचा विचार राहाऊन कुलाबा जावयाचा विचार केला. परंतु राजश्री बाजीराव पंडित प्रधान यांचे विचारें हें लग्न करून तें लग्न करावयास जावें. त्यावरून चिरंजीव राजश्री संभाजी आंगरे यासमागमें राजश्री रघुनाथ हरी यांस देऊन पुढें रवाना केलें. येथील लग्नाचा निश्चय नवमीस करून आज पंचमीस हळदीस मुहूर्त केला. स्वामीचे आशीर्वादें लग्नसिध्दी करून इंदुवारीं कुलाबा स्वार होऊन जाऊन सविस्तर स्वामीचे सेवेसी निवेदन व्हावें ह्मणोन लिहिलें असे. कृपा निरंतर वर्धमान केली पाहिजे हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)