[१४९] श्री. १७५६.
पु।। श्रीमंत राजश्री भाऊ स्वामीचे सेवेशीः- से।। विज्ञापना ऐसीजे. विनंती तपशीलवार लिहिली आहे त्याजवरून विदित होईल.
उभयतां सरदारांत पेच दिसतो. सुरळीतपणें वर्तणूक होणार नाहीं. अपसांत कटाक्ष वाढेलसे दिसतें. १. |
दिल्लीचा मनसुबा असा येऊन पडला आहे. पातशाहांत वजिरात अनायासें लागली आहे. त्याजमुळें सरकारी कार्य जी ह्मणावी तें होणार. त्यास सरदारांत अपसांत चित्त शुध्द नाहीं, याजमुळें मनसुबा सिध्दीस जाणार नाहीं, एकानीं एक ह्मणावें. दुसरेयानीं दुसरेंच ह्मणावें. यांत मनसुबा कसा सिध्दीस जाणार? याजकरितां जर दक्षणचा मनसुबा मोगल सलाबतजंग कजिया न करी, तर स्वामींनी श्रीमंत र॥ नानास्वामीसुध्दां दिल्लीस यावें आणि पातशहांत, वजिरांत एकता करून द्यावी, अगर पातशहाची मर्जी करावी. आपलें कार्य मातब्बर. द्रव्य, मुलुख घ्यावे असा समय कधीं येणार नाहीं; आणि स्वामीखेरीज सरकारी कार्य मातब्बर होणें नाहीं. जालें तर बंदोबस्त होणार नाहीं. असे पेच आहेत. स्वामीचे सरकारी धोडप, रामसेज वगैरे आले, त्याजकरितां मोगल कजिया करील असें असिलें तर श्रीमंत र॥ दादासाहेबास पाठवावें. परंतु सदर मनसुबा श्रीमंत र॥ नानास्वामी व आपण येऊन बंदोबस्त करून जाल तरीच सरकारी कार्य होईल, आणि स्वामीचा हुकूम राहील. असें आहे. कितेक वर्तमान पत्रीं लिहितां न ये. भेटीस येतो, साद्यंत विदित करीन. स्वामी सर्वजाण आहेत. असलेलें वर्तमान सेवेसी लिहिलें आहे. १ |
मीहि येतेसमयीं सरदारांची भेट घेऊन येईन. वर्तमान सर्व पाहोन येऊन वरचेवर जें होत जाईल वर्तमान तें लिहीत जाईन. लक्षमण शंकर अजारी बहुत आहेत. हातपाय सुजले आहेत. बहुत दिवस रहाणार नाहीं. बहुत काहाल आहेत. १. |
|
र॥ गंगाधरपंत तात्या व र॥ नारो शंकर यांचें वर्तमान पेशजी लिहिलें होतें त्यास हे त्या कश्यपावर आहेतच. अद्याप तो मनसुबा टाकीत नाहीं. परस्परें पत्रें खेळतात. भेटीनंतर सेवेसी विदित करीन. कितेक मजकूर मनसुबे आहेत, पत्रीं कोठवर लिहावें? वरचेवर वर्तमान सेवेसीं लिहित जाऊन. १. |
|
या प्रांतीं स्वामीं आलियाविना बंदोबस्त व सरकारी कार्य होणार नाहीं. याजमध्यें सर्व आहे. स्वामी सर्वज्ञ आहेत. ज्याची फिकिर त्याजलाच असते. १. |
जें वर्तमान आहे तें सेवेसीं लिहिलें आहे. मीहि सत्वरच येतों. सेवेसीं आलिया सर्व विदित करीन. सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना.