[१४४] श्री. १९ फेब्रुवारी १६९९.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २६ बहुधान्यनामसंवत्सरे. फाल्गुन बहुल दशमी गुरुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजाराम छत्रपती यांणीं राजश्री महादाजी बल्लाळ सभासद, सुभा दाभोळ यांसी आज्ञा केली ऐसीजे :- स्वामी कर्नाटकास मसलतेस जातेसमयीं लष्करच्या लोकांनीं वतनाचे कितेक मुद्दे घातले व पूर्वी स्वामी चंदीस असतां मुद्दे घातले, त्याजप्रणें त्यांचे समजाविशी निमित्य वतनाचे कागद करून दिल्हे आहेत. ये गोष्टीनें एकाचे वतनास एक खटका करावयास उभा राहिला आहे ह्मणून कळों आलें. तरी चंदीच्या प्रसंगें व मसलतेच्या प्रसंगें व समजाविसी निमित्यें वतनाचे कागद ज्यानें जसे मागितले त्यास तसे दिल्हे. कांहीं प्रमाण नाहीं. याजकरितां पूर्वील कागदपत्र वतनाचे विषयीं घेऊन येईल अगर एकाच्या वतनास दुसरे खटके करितील त्यास ताकीद करून कागदपत्र हुजूर पाठवून देणें. स्वामी र॥ कोन्हेरपंडित न्यायाधीश यांस आज्ञा करून बारहक्क मनास आणून तुह्मास आज्ञापत्र सादर होईल त्याप्रमाणें वर्तणूक करणें. तोंवर नूतन वतन एकंदर कोणाकडे न चालविणें. कैलासवासी स्वामीचे वेळेस ज्याचें वतन चालिलें असेल त्यास बिलाकुसूर चालविणें.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)