मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

                                                                                 लेखांक ३३.                                             १७१४ मार्गशीर्ष शुद्ध १३.

पुा व्यंकटराम पिला गोसावी यांस-

आसिर्वाद विनंति उपरि तुमची पत्रें व अखबारा राजश्री नाना यांचे नांवें आल्या त्या वाचून पाहून लाखोटे करून पुण्यास रवाना केल्या पत्रांत लिहिलें आहे की सविस्तर मजकूर राजश्री गोविंदराव बापू यांचे पत्रीं लिहिला त्यावरून कळेल त्यास याउपरी तुह्माकडून पत्रें नाना यांचे नांवे येतील त्यांत ऐसे लेहू नये अखबार आमचे पत्रांत घालून पाठवीत जावी आणि नाना यांचे पत्रीं ल्याहावें की इकडील वर्तमान अखबार गोविंदराव बापूकडे पाठविली आहे त्याजवरून सर्व अर्थ ध्यानास येईल याप्रा नानाचे नांवे पत्रांत मजकूर लेहून पत्र खुलें बेगोंद इकडे पाठवीत जावें रा छ ११ राखर हे असिर्वाद.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries