मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)

नरसिंगराव अमील ताा मानूर                                                      लेखांक १५३.                                                      १७१५ चैत्र शुद्ध २.
यांस पत्र दयारामभट शास्त्री
याणी मागितलें सबब.

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री नरसिंगराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिो असावें विशेष वेदशास्त्रसंपन्न राजश्री भगवंतभट बिन दयाराम भट शास्त्री अंतापूरकर व सिद्धेश्वर बिन भोलानाथ शास्त्री औरंगाबादकर या उभयतांस नवाब शमषुलउमराबाहादूर याणी ता मानूर एथें दर आठ आणेप्रा उभयतांस एक रुपया रोज इनाम करून दिल्हा त्याच्या सनदापत्रें दिल्ही व तुह्मास पत्रें पेशजी पा असतां अद्याप यांचे रोजाचे ऐवजाचा फडच्या न केला ह्मणोन कळलें त्यास नवाब मवसूफ याणी रोज करार करून दिल्हा त्याप्रा बेदिकत ऐवज यांचा यांस पावता व्हावा तें न करतां बोभाट आला त्यावरून नवाब अजमुलमुलूकबाहादूर यांसी बोलणे होऊन त्याणी पत्र निक्षूण यांचे रोजाचा ऐवज पत्र पावतांचे भोलानाथ शास्त्री यांसमागमे औरंगाबादेस पावती करून देण्याविषी लिहिले व सदरहूअन्वयें अबूसमदखान यांचेहि पत्र पा आहे त्यास सन १२०२ सालबाबत रोजाचा एकंदर साल तमाम ऐवज भोलानाथ शास्त्री यांस देऊन औरंगाबादेस त्यांजला पावते करून तेथें पावल्याचें त्यांचे पत्र घेऊन आमचे नावें पाठवावें यांचे रोजाबदल ऐवजास याउपरि दिकत न पडतां सनदेबमोजीब साल दरसाल ऐवज पावतां करीत जावा उभयता शास्त्री यांचे अगत्य कसें याचा ता ल्याहावा ऐसें नाहीं सनदा व इनायतनामे वगैरे पत्राच्या नकला तुह्मी घेऊन असल पत्रें यांजला भोगवट्यास द्यावी व जमीदाराचेंहि पत्र करून देवावें रा छ १ षाबान बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries