पत्र कासीराव नलदुर्गकर किलेदार लेखांक २४३. १७१५ वैशाख वद्य २.
यांस पांडुरंग रघुनाथ यानी
मागितल्यावरून छ १६ सवाली.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कासीराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावे विशेष मौजे बारुल पा नलदुर्ग एथील पाटीलकी राजश्री विठल रघुनाथ यांची आहे त्यास मारनिले आमचे पदरी हे तुह्मास वाकीफ असेल ल्याहावेसे नाही पाटीलकीची आंबराई तेथे आहे त्यास जप्ती अलीकडे जाल्याचे ऐकिलें त्यावरून महमदकबीरखानबाहदूर यांसी बोलण्यात आले त्यानी आंबराईची परवानगी देऊन सिवशंकरपंत यांजला पत्र लेहून देण्याचे सांगितले त्यावरून मारनिलेनी राजश्री त्रिमलराव यांस व तुह्मास पत्रें दिल्ही ती रवाना केली आहेत पाटीलकी आह्माकडील समजोन हकलवाजिमा व आंबराई चालावी दिकत होऊ नये हरएकविषई यांचे साहित्य करावे रा छ १६ सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)