बापू वैद्य यांचे मागितल्यावरून लेखांक २१५. १७१५ वैशाख शुद्ध ८.
पत्र लिहिले असे रा छ ७ सवाल.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तिमाराव स्वामीचे सेवेसी-
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि एथील कुशल जाणून स्वकीयें लिहित असावें विशेष मौजे मेडेगाव वगैरे च्यार गांव पा बाराहली हे गांव तुह्मी वो रा बापू वैद्य यांजकडे मख्त्याने इस्तावा सालबसाल करून सांगितले मारनिलेनी आपले तर्फेने देहाय-मारचे कामावर चिंतामणी यास मुकरर करून ठेविलें गांवचा कुल कच्चा आकार यानी घेऊन सरकारचे इस्तावियाप्रो ऐवज द्यावा असे अस्तां सन १२०२ फसली सालात तुह्माकडील काळोपंत अमील याणी गांवचा ऐवज येणेप्रो नेला त्याची याद अलाहिदा आहे त्यास वाजबी देणे घेणे यास जुलुमज्यास्ती नसावी ह्मणोन हे पत्र लिहिलें असें की यादीप्रो अन्याय मनास आणून काळोपंत यांस निक्षूण ताकीद करून सदरहू यादीची ऐवज इस्तावियाचे ऐवजात मुजरा द्यावा अथवा जे नेले आहे ते चिंतामणी यास देऊन रसीद घ्यावी पुढे गांव निर्वेधपणे याचे यांजकडे चालवावें फडफर्मास वगैरे काय जे असेल ते यास देवावे यासहि लाभ इतकाच आहे येविसीचा फिरोन बोभाट येऊ न द्यावा घराऊ काम जाणून लिहिले आहे खासगत काम समजोन लिहिल्याप्रो अमलात आणून याचे उत्तर लौकर पाठवावें रा छ ७ सवाल बहुत काय लिहिणे लोभ कीजे हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)