गोपाल नरसिंह जिवनगीकर लेखांक २११. १७१५ अधिक वैशाख वद्य १४.
याने पत्र मागितले त्याजवरून
छ २७ रमजान.
खांसाहेब मेहरबान दोस्तां सिदीइमामखां बाहदूर सलामत-
४ अजदिल येखलास गोविंदराव कृष्ण सलाम आं की एथील खैर अफीयत जाणून आपली खैरखुषी हमेषा कलमी करावी दिगर मजमून गोपाल नरसिंह मौजे जिवनगी एथे आह्माकडील गांवी बहुत दिवस आहे यानी एक मनुष्य तीन वर्षांचे कराराने नौकर ठेविला तीस रुो आगाव दिल्हे पैकी एक वर्ष चाकरी जाली दोन वर्षे करारबमोजीब राहिली असतां तो माणूस तेथून उठोन चितापूर तालुक्यांत जाऊन राहिला आहे ह्मणोन कळले त्याजवरून लिा असे त्यास चितापुरी आपल्याकडून कोण असेल त्यास ताकीद करून यांचा मनुष्य यांचे स्वाधीन करून देवावा अथवा दोन वर्षेंबाबत आगाऊ ऐवज त्याने यांजपासोन घेतला तो व्याजसुधा फडच्या करून देवावा रा छ २७ रमजान ज्यादा काय लिहिणे.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बावीसावा (१७९२-९३)