लेखाक ३०
श्री १६५१ आषाढ वद्य ३
स्वस्ति श्रीराज्याभिषेकशके ५६ सौम्यनामसवत्सरे आशाढबहुलपचमी भृगुवार क्षत्रियकुलावतस श्री राजा शभुछत्रपति स्वामी याणी राजश्री कान्होवा नाईक यासि आज्ञा केली ऐसी जे पूर्वी राजश्री गणोवा नाईक सरदेसाई माl प्रभानवली व दाभोल यास राजश्री शाहूराजे दाजी याची जाऊन भेटी घ्यावी लागली होती त्यास भयप्रदर्शन व्हावे ह्मणून तुह्मास राजश्री शिवाजीराजे दाजी याणी रागण्याचे मुकामी पत्र करून दिल्हे त्या उपरि विषालगडचे मुकामी खरसवत्सरी गणोवानाईक याणी हुजूर येऊन दर्शन घेतले तेव्हा तुह्मास पत्र दिल्हे होते ते रद करून त्याचे वतन त्यास चालवावयाची पत्रे दिल्ही ऐसे असता तुह्मी रागण्याचे मुकामीचे पत्र राजश्री कान्होजी आगरे सरखेल यास दाखऊन याच्या वतनासी कथला माडला आहे तर ऐसे करावयास तुह्मास गरज काय या उपर याच्या वतनासी कथला एकदर न करणे फिरोन हुजूर बोभाट येऊ न देणे याच्या वतनासी तुह्मास समध नाही जाणिजे निदेश१ (१ येथून अक्षराचे वळण निराळे आहे) समक्ष
रुजु सुरु सूद बार