सु॥ सीत अर्बैन मया व अल्लफ, सन ११५५ फसली,
अव्वल साल छ ४ जमादिलावल, २५ मे १७४५,
ज्येष्ठ शुध्द ६ शके १६६७.
छ १० जमादिलावल (३१ मे १७४५) भाऊसाहेब सालगुदस्ता छ २८ रबिलाखरी (३० मे १७४४) साता-यास गेलेले आजरोजी पुण्यास परत आले. रामजी शिंदे सुजहालपुराजवळ राणीगंज नावाचें खेडे आहे, त्या ठिकाणी मयत होऊन दहन झाले. दुखोटा छ २९ जमादिलाखर रोजी (१९ जुलै १७४५) बायकोस व पुत्रास श्रीगोंदे मुक्कामी पाठविले. बायकोचे नाव मीनाबाई होते. मलकामचे बुकात नमूद आहे. छ १३ रज्जब (२१ जुलै १७४६) नानासाहेब व बापूजी भिवराव सुभा भेलशाची स्वारी करून पुण्यास परत आले. छ १८ रज्जब (१९ जुलै १७४६) धर्मादाय देणें बजरबटू, बैरागी, अष्टमीचे उत्साहाबद्दल सालमजकुरीं मात्र दिलें. दरसाल न द्यावें. मोईन नव्हे. याप्रमाणे झालें. छ ८ रमजान आश्विन शुध्द दशमीस (१३ सप्टेंबर १७४६) स्वारीस साता-यास निघाले. छ २९ सवाल (३ नोव्हेंबर १७४६) मार्गशीर्ष मासीं खंडेराव जाधव मयत झाले.
सु॥ सब्बा अर्बैन मया व अल्लफ, सन ११५६ फसली,
अव्वलसाल छ १५ जमादिलावल, २५ मे १७४६,
ज्येष्ठ वद्य २ शके १६६८.
छ २५ जमादिलावल (४ जून १७४६) अव्वल साल जैंतपूर घेतल्याचे वर्तमान साता-यास आलें. छ २१ जिलकाद (२४ नोव्हेंबर १७४६) मार्गशीर्षमास भाऊसाहेब यांस मुलगा झाला. छ ३ जिल्हेज (५ डिसेंबर १७४६) भाऊसाहेब साता-याहून स्वारीस निघाले. कर्नाटक प्रांतास सखारामबापू बरोबर होते. छ ३ जिल्हेज (५ डिसेंबर १७४६) रतनगड फत्ते झाल्याचें वर्तमान आलें. मोहरम महिन्यांत (जानेवारी १७४७) अडर आजरें येथे लढाई झाली तीत भाऊसाहेब मायनहळ्ळी बिदनपूर येथें लढाई झाली रबिलावल (मार्च १७४७ महिन्यांत) याच मुक्कामी मुरारराव घोरपडे यांची भेट झाली. छ २९ रबिलावल रोजी (३० मार्च १७४७) बहादूरबिंडा किल्ला घेऊन स्वारी परत निघाली. छ १३ रबिलाखर (१३ एप्रिल १७४७) श्रीमंत नानासाहेब यांनी निरोपाची वस्त्रें घेतली. नंतर पंढरपुरास गेले. तेथून परत येताना, जेजोरीनजीक भाऊसाहेब कर्नाटकांतून आलें, त्यांची भेट झाली. दोन्ही स्वा-या एकत्र होऊन छ २४ जमादिलावल रोजी (२४ मे १७४७) पुण्यास आले, सखाराम भगवंतसुध्दा श्रीनिवास परशराम ऊर्फ श्रीपतराव प्रतिनिधि मार्गशीर्ष वद्य ८ रोजी शांत झाले. स्त्री राधाबाई माहुलीस सहगमन गेली. श्रीनिवासराव यास पुत्र नाहीं. सबब जगजीवन परशराम यास प्रतिनिधिपदाची वस्त्रे दिली. यमाजी शिवदेव यास मुतालिकीची वस्त्रें दिली. छ १४ जिल्हेज पौष वद्य १.