पो। छ २ रमजान लेखांक १७७. १७०२ भाद्रपद शु॥ ५.
सन इहिदे समानीन. श्री. ३ सप्टेंबर १७८०.
राव अजम कृष्णराव नारायणजी दाममो।हू मोहिबान पन्हा मखलीसान दस्तगा. येथील खुषी जाणून आपली शादमानी हमेषा कलमीं करीत यावें दीगर. आह्मी घांट उतरून मखालिफाचे तमाम तालुका ताख्तताराज करून कितेक गडकिल्लेहि घेतल्या पेषजीं मफसल लिहिलें आहे. हालीं रावतनेरळचा गड व चेतपटचा किलाहि घेऊन अरणीचे किलेस मोहसरा केला आहे. दोन तीन रोजांत अरणीहि घेऊन आरकाडाकडे कूच करून जात असो. इकडून तो कराराप्रों। अमलांत येत जात आहे. मदारुलमहामहि कराराप्रों। इंग्रजांचे तंबीचे कामावरीच पका खंबीर असीजेस वरचेवर सांगत जावा. हमेषा आपली बादमानी कलमी करीत आलें पाहिजे. जियादा लिहिणें काय असे ?