पो॥ छ १८ साबान लेखांक १७६. पो॥ १७०२ श्रावण व॥ ४.
सन इहिदे समानीन. श्री. १९ आगस्ट १७८०.
राव अजम कृष्णरावजी दाममो।हू मोहीबान पन्हा
मखलीसान दस्तगा :--
येथील खुषी जाणून आपली षादमानी हमेशा कलमी करीत यावें. दीगर, थैली मदारुलमहाम यांची व निभावणीचें खत राव सिंदे यांची पाठविलें तें पोंहचून मफसल हकीकत मालूम जाहला. हालीं मदारुलमहाम यांस थैलीचा जवाब व राव सिंदे यांसहि जवाबाची थैली पाठविला आहे. बदामीचा किलेदार व अमलदारांनीं केरूरचे तालुकेकरितां दिकत केल्याचा मजकूर लिहिला होता. तर, हालीं बदामीचा किलेदार व अमलदाराचे नांवें केरूरचा तालुका ठाणेंसहित रावरास्ते यांचे सुपूर्द करितेस जारे ताकीद पाठविला आहे. इतक्यावर बिलाउजूर केरूरचे तालुका बमय ठाणें हवालीं करितील. हमेषा आपली खैरीया कलमी करीत यावें. जास्त लिहिणें काय असे ? ताजाकलम- मदारुलमहाम वगैरेनीं आपणास लिहिलें खत पाठविलें तें परतोन पाठविले आहे. पोंहचले. तहरीर तारीख छ २ शाबान. ताजाकलम बिलफैल चेतपट नामें किल्लेस माहसरा केला आहे. तेहि मकान घेऊन चेनापटणाकडे कूच करून जात असों. मालूम जाहलें पाहिजे.