पो॥ छ १७ साबान लेखांक १७५. पो॥ १७०२ श्रावण शु॥ १३.
सन इहिदे समानीन. अलीफ. १२ आगष्ट १७८०.
राव अजम कृष्णरावजी दाममोहूः--
मोहीबान पन्हा मखलीसान दस्तगाः येथील खुषी जाणून आपली बादमानी हमेषा कलमी करीत आला पाहिजे. दरींविला आपण र।। होऊन गेल्याबाद व पुणीयास पावल्याची खबर आली नाहीं. जलद खैरीयतेनें जाऊन पोंहचल्या मजकुरास कलमी करावें. आपणांस र।। करून पाठवून आह्मीं बेंगळुराहून कूच केलें. ते घांट उतरून फिरंगी याचे तालुक चेंगम व कळसपाक व पोळूर व तिमरायगड व सुलभगड वगैरे मकानेस ठाणा घातले. सदरहू मकानेहून येक हजार बारचे जवान व तुरकसवार फिरंगीचे दोनशें घोडे पाडाव केले. यासिवाय चेनापटण व आरकाड व वेळूर व त्रिचनापली व मा। बंदर व देवणापटण वगैरे तमाम तालुकेंतहि स्वारी पाठवून बहुताद लोकांस गारत केलें. मछलीबंदराहून फिरंगी याची जमीयत बदल आरकाड व चेनापटणास कुमक जाणें बदल गुंठुरचे राहेनें येत असतां, इकडून दहा हजार फौज पाठवून त्या जमीयतेस घेराघेरी व मारामारी करवीत आहे. चहूंकडून त्याचा तालुका ताख्तताराज करवीत आहे. फिरंगी यांनीं इकडे चेनापटणाकडे षह लागला ह्मणून सिकाकोल, राजबंदर, व मछलीबंदर वगैरे जागेजागेची फौज तमाम आणवून जमा करीत आहेत. त्यांनीं मोकाबिलेस येतील तर खुदाचे फजलेकडून जे काय तंबी होईल ते जहुरांत येईल. निजामअलीखानांनीं मछलीबंदराकडे जाणेचा करार होता. त्यांनीं अजीलग हैदराबाद सोडून निघाले नाहीं. त्याची चेलन वगैरे यावरूनच पहावा. इकडे चेनापटणवालेस खूब ताण बसला आहे. याकरितां फिरंगी यांनीं सलूकाचा पैगाम मदारुलमहाम यांसीं खातिरखाः लावितील. तरी दोन साल तीन साल लागलियाहि त्याच्या तंबीचे कामावरीच खंबीर असिजेस. मदारुलमहाम यांस सांगत जावें. हमेषा आपली बादमानी कलमीं करीत यावें. जियादा लिहिणें काय असे ?