लेखांक १५४. १७०२ ज्येष्ठ व॥ ३.
श्री. २० जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. राजश्री परशरामपंतभाऊ फौजसह कोल्हापूर प्रांतांतून येऊन, गोकाकेस कितुरकर देसाई यांस उपद्रव केला. तेथें लगते तालुके नवाबसाहेब यांचे. तिकडे स्वारीशिकारी करितात ह्मणोन धारवाड वगैरेहून यांची बातनी आली. त्यावरून नवाबसाहेब यांणीं आह्मांस सांगितलें कीं, कोल्हापूर व कितुर हें काम किती हाताखालील, जेव्हां ह्मटलें तेव्हां त्यास नसीयेत होईल. इंग्रजांचें काम उमदें. तिकडे भाऊंची रवानगी करावी. भारी मसलतीवर नजर असावी, ह्मणोन लिहिलें. ऐसियास येसाजी सिंदे व मानाजी फांकडे व सटवोजी भोंसले व कितुरकर यांणीं बेनिहायेत बेअदबी केली. सरकार तालुकियास मनस्वी इजा दिल्या. कितेक गांव ताराज केले. वोली धरून नेल्या त्या अदियाप सुटल्या नाहींत. यांची तंबी करणेंच सलाह जाणून भाऊंची रवानगी जाली. मशारनिले यांणीं तंबी केली. याचा त॥ वरचेवर तुह्मांस लिहिण्यांत आलाच आहे. दोन महिने फौज फिरवून असावें ऐसें होतें. परंतु, नवाबसाहेबाचा तालुका लगता, यांस उपसर्ग लागेल ऐसें समजोन मवकुफ केलें. हें भाऊंनीच लिहिलें. कितुरकर यांजकडील पेशकशातचा जाबसाल जाला. सरकारतालुका त्याणें कांहीं दाबला त्याचा फैसला जाला ह्मणजे फौजा छावणीस येतील. करवीरकर रुजू जाले उत्तम; नाहीं तरी पांच हजार फौज त्यांच्या तोंडावर राहील. नवाबबहादर यांचे तालुकियास काडीमात्र उपद्रव जाला नाहीं, अमिलांनीं व तालुकदारांनीं उगेंच फौजा गोकाकेस आल्या इतक्यावरच लिहिलें असेल, याची चौकसी करावी. दोस्ती जाली तेव्हां, हे चाल इकडून सहसा होणार नाहीं. याची खातरजमा असावी. हें आमचे तरफेनें तुह्मीं नवाबबहादूर यांसी बोलावें. *नवाबबहादर यांचे तालुक्यास उपद्रव लागला नाहीं. कोल्हापूरकर व कितुरकर यांणीं फारच बेअदबी केली, त्यांचें पारपत्य करणें हेंच प्राप्त करणें पडलें. इंग्रजांचे मसलतीस दुस-या फौजा व सरदार मवलग आहेत. र॥ छ १६ जमादिलाखर हे विनंति.