लेखांक ११४.
१७०२ वैशाख शु।।१२. श्री. १५ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. राजश्री नारो सिवदेव यांची रवानगी पाटीलबावांकडे पत्राकरितां होत आहे. अलिकडे पत्र आल्यास उत्तमच जालें. कदाचित् न आल्यास मशारनिले गेल्यावर येईलच, यांत गुंता नाहीं. परंतु हे पोंहचून पत्र येण्यास दीड महिना लागेल. तोंपावेतों मसलत राहूं नये. नवाबबहादूर यांणीं नमूद व्हावें. तुह्मीं करारप्रमाणें गुंते उगवून जलद यावें. तुह्मी आलियावर रावरास्ते यांजकडील फौज व मातबर रवाना करण्यांत येईल. सारांश, याउपरीं नवाबांनीं राहूं नये. जलद निघावें. ह्मणजे नवाबनिजामअली-खांबहादूरही सिकाकोलीकडे जातील. कदाचित् बरसात आली ह्मणोन, त्यांणीं अनमान केला तरी नवाबबहादूर........................नवाबाचें ह्मणणें एकच कीं, नवाबबहादूर यांचें जाणें चेनापट्टणाकडे जाल्यावर आमचा गुंता किमपि नाहीं, ऐसें आहे. यास्तव नवाबबहादूर यांणीं फार सत्वर निघावें. वारंवार काय ल्याहावें ? सर्व पल्ले व मसलती नवाबबहादूर यांचे ध्यानांत आहेत र॥ छ १० जमादिलावल हे विनंति.
पै छ २६ जमादिलावल, सन समानीन.