लेखांक ३
श्री.
''करीणा राजश्री बावाजी जुंझारराव देशमुख तर्फ कानदखोरे करिणा ऐसाजे :- जिवाजी बीन तुळबाजी मरळ याचा वडील मूळ पुरुष बाजी मरळ. यासी आपले वडिल राजश्री बावाजी जुंझारराऊ यानी बाजी मरळास मौजे दापोडे येथील हाक नेमून दिल्हा होता, तो बाजी मरळ खात होते. यास तपसिल कणसारा अडिच टके व माहाल तूप गाव खंडी गलाव उडिद कोहल कणसारा येणेप्रमाणे थोरले राव यांचे कारकिर्दिस चालत होते. त्याउपर बाजी मरळ रुसनुका करून, पुरंधरास जाऊन राजश्री नरसिंगराव साहेब पेशवे याचे मुतालिक राजश्री भानजीपंत हे राजश्री कान्होजी जुंझारराव देशमुख याजवळ येऊन वर्तमान विदित केले कीं, ''बाजी दापोडाचा हाक मागतात. तो द्याल तर त्यास समजाऊन आणून विलाइतीचा बंद राहील'' ऐसे वर्तमान सांगितले. त्याउपर कबूल करून, जाचती नवे नगद टके ऐसी व गाव खेडी व माहार तकसीम दापोडे पावणेसात सेकार ऐसे देऊन, समजावीस माहाल व पर माहाल याचे इदमाने समजावीस करून, बाजी मरळ पुरंधरीहून समजावीस करून, मौजे दापोडे येथे येऊन राहोन, तेथील हक लाजमा खाऊन होते. त्याउपर करकशा काही जाला नाही. मग राजश्री कान्होजी जुंझारराव आपले आजे यानी तुळबाजी मरळ एकत्र चालू लागले. त्याजवर मौजे दापोडे येथे आपला खासा इनाम होता, तो त्यास साठी रुपयासी दिल्हा. त्याउपर अवरंगशाहा पातशाहा हे स्वार होऊन या प्रांते येऊन, देश दुर्गे आक्रमण करून, राजगड प्रचंडगड व सिंहगड घेतले. आपल्या वडिलास राहावयासी जागा नाही. मग कोकण प्रांते आपले आजे व तीर्थरूप ऐसे निघोनि मोजे निगडौली ता। वनखल येथे कबिलासुध्दा राहिले. त्यास मौजे नादेटन तर्फ सोनाले येथे येसजी बीन जिवाजी नाईक व रामाजी बीन बाळाजी नाईक व सिजी बीन आबाजी नाईक मौजे दापोडे तेथे होते. तेव्हा तेथून आमचे आजे कान्होजी बावा याचे भेटीस आले. भेट जालिया उपर मोजे निगडवलीचे मुकामी काही खर्चावयाची बेगमी नव्हती. मग यानी बेगमी केली ह्मणोन यासी मौजे लासिरगाऊ येथील हाक दिल्हा. ते समई याणी भाऊपणीयाचा करकशा केला नाही. मग आपले वडील व त्याचे वडील माहाराज छत्रपति शाहूस्वामी तांब्रारातून स्वार होऊन दक्षण देशास आले. मुलकास कौल जाले. त्या उपरांतिक आपले वडिल व याचे वडिल कबिले घेऊन माहालासी आले. माहालासी येऊन राहिले तेच वरसी शामळाने पाळत करून, आपले आजे कान्होजी बावा व कबिला देखील धरून, भाद्रपद मासीं दंडाराजपुरी इथें सा महिने बंदी ठेविले. त्या उपरातिक दंड करून माथा ठेविला. मग माघ वद्य त्रयोदशी सिवरात्र करावयासी माहालासी पैवस्ती जाली. मग आपल्या आज्याचें वृध्दपण व बंदी राहून शरीरास हागवण प्राप्त जाली होती. तेसमई अंतकाल व्होऊं लागला, मग तुळबाजी मरळ यासी व आपले तीर्थरूप राजश्री नारायणजीबावा यासी आज्ञा केली की, आपला अंतकाल आहे. नारायणजीचे पाठीसी कोण्ही नाही. याकरिता तू शाहाणा माणूस ह्मणोन तुझे हातीं दिल्हे. एकमते चालत जाणे ह्मणोन तुळबाजीस आज्ञा केली. त्यावरून तुळबाजीने क्रिया केली की, नारायणजी जुंझारराव यासी एकमतें एकविचारें चालत जाऊ. ह्मणून श्रीधानेश्वराची क्रिया केली. मग दाहा वीस वरसे सुधामत चालिले.