पत्रांक ५९
श्रीशंकर
राजश्री सखाराम भगवंत यांसि व गोविंद शिवरामसि
विनंति उपरि भोजनोत्तर चार सा घटिका बसोन फडशा केला पाहिजे बराबर गोपाळराव कृष्णराव बल्लाळ व रास्ते यांस हि घेऊन येणें आम्हांकडील हि कारभारी बोलाविले आहेत सारे च पाहिजेत एक कमी कामास नये सा-यांचे गुजारतीनें चिट्या हवाला कराव्या लागतील पुढें कितेक लंढे राहतील ते उगवण्यास दिक्कत पडली न पाहिजे नाहींतरी चिट्या किल्ल्याच्या हातास आल्यावरी तुमची काळजी हरली मग आमची कामें ढालढकलीखालीं पडल्यास कसें पुरवेल यास्तव अगोदर पक्कें करावयास सारे पाहिजेत हे विनंति