पत्रांक ३६
श्रीशंकर
राजश्री गोविंदपंत तात्या स्वामी गोसावी यांसि
विनंति उपरि कितेक प्रकारें घराऊ मजकूर लिहून पत्र जासुदा बा। पाठविलें कीं तेथे श्रीमंतासी एकांती गांठ सर्वदा पडत असेल समयोचित आपले कार्याच्या गोष्टी बोलून आपले कार्य होऊन येई त्या प्रकारावर मर्जी युक्तीने आणून आम्हांस उत्तर आलिया तुम्हीं बलाविल्यास आम्ही हि येऊं त्यास उत्तराची मार्गप्रतीक्षा करीत असों उत्तर पा। सातरियास वेंकाजीपंत राणोजी शिंदे परस्परें एक मिळणींत नव्हते राणोजी शिंदे केवळ जागा जतन करून श्रीमंतांचे पायाशी एकनिष्ठ होते त्यास अलीकडे तो प्रकार नाहीं किल्ल्याचा बंद तुटल्याउपर किल्ला वेंकाजीपंत आपले लगामीं लाऊन घेऊन किल्याचा बंदोबस्त अंतस्तें आबा पुरंदरे करणार वेळ असेल तर मुख्य आपण एक जाल्यावर सर्व गोष्टीस पाणी घालणार ऐसीं खुळें लागली ऐसीं लिहिलीं एकदोघांचीं परिछिन्न आलीं या राजकारणांत हालीं चिंतो अनंत आले हें च लष्करांतून हि सकारपूर्वकाचें पत्र राणोजी शिंद्यास उमेदीचे आणून बुद्धिभेद केला असें स्पष्ट लिहिलें आलें हे विनंति