हू.
लेखांक ९५.
१६९७ चैत्र वद्य ७.
अजम वुइलिम हारनबी इस्कोयर प्रजीदेंत गोवर्णदोर जनराल बंदर मुंबई दाममहबतह :
शाहामत अवली मर्तबत हशमत व मजीलत मवलात दस्तगाहाय अतिजाद दोस्तां अजि ज्यानीब चितीं विठ्ठल सलाम अजाम आंके येथील खैरखुशी जाणून आपलीं खैरखुशी हमेषा कलमीं करीत गेले पाहिजे. दीगर. बहुत रोज मोहिबाकडून खत येऊन खबर मालू होत नाहीं. याजवरोन ताजूब दिलांत आलें आहे. तरी हे बात दोस्तीचे जागां लाजीम नसे. खतखतूत हमेषा पाठऊन दिलखुषी बेयैत करावे. शाहामतअवलीपन्हा महादजी सिंदे फौजसुद्धां शाहामतपन्हा तुकोजी होळकर फौजेसुद्धां गुजराथप्रांतें दरकुच येऊन नर्मदापार मुकाम केला आहे. इजानेबाही याचे सोबत आहेत. त्यास, याची व मोहिबाची दोस्ती एकरंग चालावी हें इजानेबाचे दिलांत येऊन हें खत कलमीं केलें आहे. तरी आपले दिलांतील खुलाशाचा मजकूर कलमी करावा. त्याबमोजी शाहापतपन्हा यांजसी जवाबसाल होऊन कलमी केला जाईल. पेशजी इज्जतमहा दादो मल्हार मोहिबानजीक रवाना केले ते जाऊन पोहोंचोन मजमून मालूम केलाच असेल. तरी ज्या बातेंत दुतर्फा दोस्ती इज्यानेबाचे दरम्यानगिरीनें चालेल तेच बात दिलांत आणावी यांतच नफा असे. ज्या बाता त्या मकानीं असतां रुबरू बोलण्यांत आल्या होत्या, त्याप्रमाणें गुदस्तां दरपेष अंमलांत आल्या. याची हायेस दिलांत आलीच असेल. हेंच जाणून दोस्तीचे जागा कलमीं केलें आहे. तें दिलांत यावें. परस्परें दोस्ती यांची व मोहिबाची असावी, यांत नफाच दुतर्फा आहे. व दीगरबात परस्पर असिल्यानी नफा नाहीं, हेंच इजानेबाच्या बातांत व दोस्तीचे जागां मालू व्हावें, सबब कलमीं केलें आहे. तरी हे बात दिलांत आणून जबाब पाठवावा. रा। छ २१ सफर. ज्यादा काय लिहिणें ? हे किताबत.