पत्रांक ४२५
श्री. १७१८ पौष वद्य १
( नकल )
नवाब-साहेब मेहेरबान दोस्ता आजमुल-उमदाबहादुर सलमु हुतालाः-
छ १० माहे रजबीं आपल्यासी बोलून बाणाजी व कृष्णाजी सेटे आले. त्याणीं आपला खुलासा त्रिवार वचनाचा सांगितला. तो ध्यानास आला. त्याजवर छ ११ माहे रजबीं राजश्री कल्याणराव राजेबहादुर याजबराबर कालचें बोलल्याप्रमाणें आपण रुका व जिन्नस पाठविला तो पावला. त्या अन्वयें आह्मीहि तुह्मांसी निखालस आहों, येविसी खातरजमा ठेवावी. दुतर्फा सरलता जाली, जें होणें तें आपले आमचे विच्यारें होईल. आपण राजश्री बालाजीपंत नानाविषय दोन गोष्टी लिहिल्या. त्यास नानानीं कारभारांत असावें अगर नसावें याचे गुणदोष पुरतपणें पाहून, तुह्मी आह्मी मिळोन ज्यांत श्रीमंतांचे दौलतीस चांगलें तैसें करूं. आपली आमची दोस्ती पूर्वीपासून आहे. आणि छ १ माहे जमादिलावल सन १२०६ फसलीमध्यें तहनामा जाला आहे त्याजवर आपण आह्मी कायेम आहोंतच. पुढें ज्यांत दोस्ती ज्यादा वाढेत जाये तैसें दुतर्फा वर्तणुकेंत येत असावें. रा। छ १४ रजब, सु।। सबातीसैन मया व अलफ.
जादा काय लिहिणें ? हे किताबत.