पत्रांक ४२३
श्री २ १७१८ पौष शुद्ध १४
श्रीमंत राजश्री बाबासाहेब साहेबाचे शेवेसीः-
* शार आहों. परंतु शाहाची फौज बहुत. त्याच्या मुकाबल्याप्रमाणें इकडीलहि फौजेचा जमाव असता, तरी चिंता काय होती ? तूर्तकाळीं सरकारच्या फौजेचा भरणा इकडे थोडा. राजश्री बापू येथून पंधरा मजलावर कालपीस आहेत. वरचेवर पत्रें त्यांजला लिहितच असतों. परंतु लवकर येऊन उपराळा करतील तो सुदिन आहे. तेथूनहि बापूस आज्ञापत्रें बहुत जलदीनें लिहून, अतिसत्वर बापू फौजेसह वर्तमान इकडे येऊन पोचत, ऐसा अर्थ केला पाहिजे. हें वर्तमान एक महिना येथें कमबेस येतें. नित्य आह्मी लस्करांत लिहितच होतों. परंतु लाहोरास आलेशिवाय सत्य-मिथ्या समजेल. कारण कीं, लाहोरा पलीकडील मुलुक त्यांचा व अटक उतरलेसिवाय इकडील इरादा समजत नाहीं. परंतु नित्य कच्चें वर्तमान लस्करांत लिहितच होतों. आतां इस्वरें याप्रमाणें प्रसंग मांडला आहे. तर धण्यांनीं सत्वर उपराळा केला पाहिजे. आह्मी तर लाखाचे पेचांत आलों आहों. ईश्वर पार पाडील. चिंता नाहीं. सर्व पुण्य धण्याचें. कागदपत्री लवकर उपराळा केला पाहिजे. या समयास तहसील मुलकांतील बंद होऊन पंधरा दिवस जाले. एक पैसा येत नाहीं. पातशाचा खर्च व सिबंदीसुद्धां साठसत्तर हजार रुपयांचा दरमाहा आहे. हें हिंदुस्थान ! क्षणाक्षणाची हवा घेतात ! कर्ज सुखें एक रुपया कोणी देत नाहीं. या समयास उपराळा केला पाहिजे. बहुत काय लिहिणें ? कृपा निरंतर असे दिली पाहिजे. येथील उत्तरें पातशाचीं वगैरे जीं सला करणें तीं, येथून लस्करांत लिहिलें आहे, त्याचें उत्तर येईल त्याप्रमाणें करूं. आपणहि आज्ञा करणें ती करावी व कांहीं लाख पन्नास हजार रुपयेचा ऐवज पा। ह्मणजे पाताशाचा खर्च चालेल, नाहींतर, येकतर फौजेचे निकड, दुसरे, हुजूरचा खर्च न पावला तर कठीण. न जाणो, निदान असाच प्रसंग पडला, आण पातशायास येथुन काढूं ह्मटलें. लाखो रुपये खर्च पाठवायाची तजवीज करून उत्तर पत्र पावतांच पाठवायास आज्ञा केली पाहिजे. हे विज्ञप्ति.