पत्रांक ३०७.
श्री १७१०.
जाबता गुन्हेगारी तोतयासंबंधी बाबत मराठे वगैरे सरदार-लोक-तालुके रत्नागिरी नि।। राजश्री महिपतराव कृष्ण. सु।। तिसा समानीन मया व अलफ. पेशजी सन सीत-सबैनांत तोतया जाहला होता. त्याजकडे लोक सरदारी करून चाकरीस राहिले होते. त्यांपैकीं कांहीं असामींचे फडशे गुन्हेगारीचे पेशजी होऊन, बाकी राहिले आहेत. त्यांजपासून गुन्हेगारी घ्यावयाविसी हुजूरची आज्ञा जाहली. त्याजवरून तोतयाकडे सरदार लोक चाकर राहिले होते, त्यांचा मजकूर सुभा मनास आणून, जिवा-मवाफक गुन्हेगारी करार केली ते रु।।.
४२४६ तोतयाचे वेळेस नव्या सरदा-या करून, बरोबर लोक घेऊन, चाकरीस तोतयाकडेस राहिले होते, सा। रु।।.