[२०३] ।। श्री ।। १५ जून १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री गोविंद बल्लाळ स्वामी गोसावी यासि:-
पो॥ सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. ऐशास इकडील सविस्तर वर्तमान लिहिणें तें पेशजी पत्रीं लिहिलेंच आहे. त्याजवरून कळलेंच असेल + सुज्याअतदौला याची व नजीबखान व ज्याहानखान याची भेट जाहली. त्यास याउपरि त्यास त्यांणी साफ जाब देऊन निरोप द्यावा आणि एकपक्षी कराराप्रमाणें इकडे यावयाचें करावें. सरदारांच्या भेटी दोती दिवशीं होतील. गंगोबा आले. भेटलेयाउपरि पुरती तजवीज करणें ती करूं. तहाचा जाबसाल आहे जें ठहरेल तें लिहून पाठवूं. जाणिजे छ १ जिलकाद बहुत काय लिहिणें हे विनंति.