[१३६]                                        ।। श्री ।।                          २१ आक्टोबर १७५९.

.श्रीमंत राजश्री राउस्वामीचे सेवेसीः
विनंति सेवक बापूजी बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल ता।। छ १५ सफर पावेतों मुकाम दिल्ली यमुनातीर स्वामीचे कृपावलोकनेंकरून यथास्थत असे. विशेष. काशिदाबराबर एक दोन पत्रें पाठविलीं होतीं. सेवेसी प्रविष्ट जाहालींच असतील. यानंतर लष्कर यमुना दिल्लीजवळ उतरोन अंतर्वेदींत भागीरथीतीरीं जाणार. ऐसा मजकूर आहे. कळलें पाहिजे. दिल्लीचा कारभार झाला. अंतर्वेदींत जाऊन, जाटाची मामलत करून, रोहिले, सुजातदौला याचा कारभार करून, पुढें बंगाल्यास जावें ऐसा विचार आहे. विदित जालें पाहिजे. हे $विज्ञापना.