Super User

Super User

                                                                                   लेखांक २३९

                                                                                                  हुवलकादीर

शफकतमाह सुज्याअतअयाद मोहीदीन मलाजी खान अजम निजामखान मोकसाई कसबे नीब पा। वाई दामएखलासहू

5 अजी मोहीद फते सिताबखान व मीराखान सिताबखान सरनाईक किले सतारा व जमिये किलेहाय सलाम तुजस्ते फरजाम माहुवल मुतला आके दर सवाद मौजे मजकूर इनाम हजरत पीर सदर दर्वज बरहुकूम फर्मान अशरफ कदीमुलअयाम माकुल बाब खैर सरवावरत चालिले आहे व ते जागा लिजाहन खिजमतेस मशगुल आहे फकीराचे नानकता आहे त्यावरी नौपटी आजार तसवीस होत आहे ह्मणोन फकीर दिलगीर जाहले आहेत ते जागा मोहीदाचे अशराफ व पीराचे खनेक चालत आहे हेच बेहतर आहे बहुतेरा पैसा करावियाचे  (शिक्का)                 जागा आहेत व मोहीबास ऐसे वाजीब आहे की सरीक जियादती लगर घालावा बेरून आहद आखद नामोश आहे फकीरावरी जाजते करू नये नीम जाने गुरदुरद मरदेह दुयाबदल दरुवेशा न कुनद नीमे दीगर शफकत असार नेकलोपी असाफकी तसवजीस न कीजे अगर केले तरी ते खितीस येतील देणे पादशाही +++ दीद आकी हे किताबत                     (शिक्का)

॥ श्री ॥

शके १६६७ फाल्गुन शुद्ध ११

राजश्रियाविराजितराजमान्य
राजश्री दामोधर महादेव गोसावी यांसिः---

सेवक बाळाजीबाजीराव प्रधान नमस्कार उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहिणें. विशेष. तुह्माकडे सरकार ग्वालियेर स्व॥ राजश्री जयाजी शिंदे वगैरे ऐवज येणें. त्यापैकी ई॥ छ १९ जिल्हेजापासून पंधरा दिवसांचे आलीकडे रुपये पन्नास हजार तुह्मी द्यावे. त्यांपैकी पेशजी हरबाजी महादेव याजवर हुंडी चाळीस हजार रुपयांची शहरची पाठविली. बाकी रुपये दाहा हजार राहिले ते राजश्री रामचंद्र हरी याजकडे देविले होते. त्यास, तुह्मी ऐवज दिल्हा नाहीं, वरात माघारी टाकिली. ऐशास, तुह्मी क्षेपनिक्षेप हवाला घेतला असतां वरात माघारी टाकून रुपये न द्यावे हे कोण गोष्ट ! हाली हे पत्र तुह्मास सादर असे. तरी सदरहु दाहा हजार रुपये १०००० हुंडी सातारियाचे साहुकारावर अथवा पुण्याचे साहुकारावर करून पाठवून देणे. पत्र पावतांच सत्वर हुंडी पाठवणे. विलंब न लावणे. जाणिजे. र॥ छ १० सफर, सु॥ सित आर्बैन मया व अलफ, बहुत काय लिहिणें.

( लेखन सीमा. )

पै॥ छ २३ सफर.

                                                                                   लेखांक २३८

                                                                                                     

                                                             राजश्री आनंदगीर गोसावी                     मठ सदानंद गोसावी यासि

.ll5 अखंडितलक्षुमीअलंकृत राजमान्य सेवक महिमाजी पा। व तानाजी पा। व विठोजी पा। व परसोजी पा। व कृस्णाजी कोनोजी व विसजी पा। व बाजे बापभाऊ समस्त मोकदम मौजे गोवे सा। नीब पा। वाई दंडवत विनंति उपरी आपले आत्मसंतोसे दसनामाचे भंडारियाबदल जमीन 68१॥ दीड नजीक नदी बागाचे खाली टुकडा दीधला असे लेकराचे लेकरी चालऊन जो हिक हरकत करील त्यास श्री व आपले वडिलाचे इनाम असे हे लिहिले सही व आमचे पाटाचे पाणीयासी निसबत नाही तुह्मी आपले धरणी पाणी धरणे कलले पाहिजे हे विनंती

(निशाणी नांगर)

                                                                                   लेखांक २३७

                                                                                                       श्री

श्री सकलतीर्थामाजी कासी वर्तामाजी एकादसी देवामासी रुसीकेसी पुस्पामाजी श्रीतुलसी तैसेच आणंदगिरी गोसावी बाबा स्वामि आह्मासी स्वामिचे सेवेसी बालके राहुजी पाटील वाघोजी पाटील व कमलोजी पाटील व समस्त दाहीजन मौजे खेड बु॥ पा। सिरवल दोन्ही कर जोडून सिरसा दडवत विनंति उपेरी कृपा करून पत्र पाठविले ते सिरी वदिले ते पत्रीची आज्ञा की धर्मादाउ इनाम बिघे 68५ आहेत ते कीर्दी करणे ह्मणौन आज्ञा तरी गावी नवी लावणी होती येथे स्वामीच्या सेतास सरीक पाहातो सरीक मिळलावरी लावणी करून याखेरीज स्वामिने ते प्रांतीहून एक कुनबी पाठवावा आपले भुगतीचे सेती कीर्दी करवणे ह्मणजे आह्मी मोक्षास लागोन बहुत ल्याहावे तरी स्वामि सर्वज्ञ आहेत बालकावरी अखडित कृपादृष्टी करीत जाणे मी सेवक असे हे विनंति

॥ श्री ॥

शके १६६७ माघवद्य ७

रजिश्रियांविराजित राजमान्य राजश्री दामोदर महादेव गो॥ यांसिः-

सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणे. विशेष. तुह्माकडे सरकारचा गवालियेरचे हवाल्याबाबत ऐवज येणें. त्यापैकीं औरंगाबादेची हुंडी हरबाजी महादेव यांवरची रुपये ४०००० चाळीस हजारांची पाठविली ते पावली. सदरहू हुंडी औरंगाबादेस रवाना केली असे. हुंडीचे रुपये सरकारांत पावले ह्मणजे जमा जाहालियाचा जाब तुह्मास होईल. त्याप्रमाणें मजुरा असते. दिल्लीस न्यावयास तुह्मांसमागमें सिरपेंच दिले होते त्यापैकीं मोत्यांची जोडी १ एक पाठविली ते पावली. तुह्मी छ १९ जिल्हेजापासून पंधरादिवसा अलीकडे सरकारांत पनास हजार रुपये द्यावयाचा करार केला. त्यापैकी सदरहू चाळीस हजार रुपयांची हुंडी आली. बाकी दाहा हजार रुपये राहिले ते पत्रदर्शनीं पाठवून देणें. मुदत होऊन गेली. यास्तव एक घडी विलंब न लावितां सत्वर सदरहू रुपये पाठविणें. जाणिजे. छ २० मोहरम, सु॥ सीत अर्बैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ?

( लेखन सीमा. )

॥ श्रीशंकर ॥ शके १६६७ आषाढ शुद्ध ५

श्रीयासह चिरंजीव राजश्री पुरुषोत्तमजी व दिवाकाजी यांस प्रती दामोधर महादेव आसीर्वाद उपर येथील कुशल ता। छ ३ जमादिलाखर मु॥ प्र॥ भेळसे लशकर श्रीमंत राजश्री पंतप्रधान जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. बहुत दिवस जाहलें तुमचें पत्र देऊन वर्तमान कळत नाहीं. तेणेंकरून चित्त उद्विग्न आहे. तर सदैव पत्र पाठवून कुशालार्थ लिहित जाणें. आह्मी पातशाही लष्करांतून सार्वभौपासून रुकसत जाहलों. रुसकतीचे समई श्रीमंतास, हत्ती, व घोडा, व खिलत, जवाहीर व फरर्मान ईनायत केला. व आह्मांस हत्ती, खिलत व मोत्याचा चौकडा देऊन रुकासत केलें. तेथून दिल्लीस येऊन तीर्थस्वरूप बापूची आज्ञा घेऊन लष्करांत आलों. श्रीमंताची बुंदेलखंडांत भेट जाली. परर्मानवाडी उभी करून पातशाही ईनायत घेऊन बहुत खूष जाहलें. तदोत्तर बुंधेल्याची मामलत करून देशाकडे कूच केलें. मजल दरमजल देशास येतात आह्मी समागमच देशास येतों. ईश्वर इच्छेनें थोडकियाच दिवसांत गांवास येऊं. कळलें पा।. तीर्थरुप बापू पातशहापाशीं सुखरूप आहेत. पातशाहाची व सर्व अमीरांची कृपा विशेष आहे. व येथेंही श्रीमंतांची व सरदारांची कृपा बहुत आहे. सविस्तर तुह्मास कळावें ह्मणून लिहिलें असे. बहुत काय लिहिणें हें आशिर्वाद.

राजश्री त्रिंबकपंतास नमस्कार. यादोपंत दिल्लीस सुखरूप आहेत. कळलें पा।. थोडकियाच दिवसांत भेट होईल. भेटीनंतर सर्व कळेल. बहुत काय लिहिणे ? हें विनंती.

से॥ वेणाजी त्रिंबक सा। नमस्कार विनंती. आह्मींही समागमें आहों. भेटीनंतर सविस्तर विदित होईल. मातुश्री काकू व आकास सां। नमस्कार सांगणे. कुपा केली पाहिजे. हे विनंती.

मातोश्री काकू व मातोश्री आक्कास सां। नमस्कार. विनंति. सत्वरींच सेवेसी दर्शनास येतों. भेट होईल तो सुदिन आहे. हे विनंति.

                                                                                   लेखांक २३६

                                                                         

तीर्थस्वरूप माहाराज राजश्री भवानगीर
बाबा माहाराज स्वामी गो।

अखंडितलक्षुमी सदाप्रसन सेवेसी मोकदम मौजे आणदुरी दोन्ही कर सोडून नमो नारायण विनंती उपरि येथील क्षेम जाणून आपले क्षेम लिहीत आज्ञा केली पाहिजे विशेश दया करून कृस्णगीर पाठविले त्यास येथे इनाम बदल जाणउनु लिहिले तरी पूर्वापार तुमचा इनाम आहे व तुमचे वडिली चालत आहे त्यासि येथे ठीकी गुंतली आहे ती रिकामी जाहलीवरी तुमच्या अतीताचे हवाले करून काही सधेव नाही तूर्त करणगिरीचे हवाला दाणे मण .l68. पाच मण करितो कलेले पाहिजे येथे मठ घातलियावरी अवघा धंदा चालिला आहे इनाम हि लागत इनाम हि लावितो कलल पाहिजे माहाराजे दया करून पत्र पावीत गेले पाहिजे वडीलाचे चालविले तैसे च दया करीत जाणे बहुत काय लिहीन कृपा निरंतर असो देणे हे विनंति

॥ श्री ॥

शके १६६६ आश्विन वद्य १२

पै॥ कार्तिक वद्य ३०

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री यादोपंत गोसावी यांसीः--

से॥ बापुजी महादेव दामोधर महादेव नमस्कार उपरी येथील कुशल ता। छ २५ रमजान मु॥ इंद्रप्रस्थ जाणुन स्वक्षेम लिहिणें. विशेष. तुह्मी पूर्वी पत्र पा॥ पावलें. वर्तमान विदीत जालें. मार्गाचा हिशोब पा। तो पावला. वरकड सविस्तर चिरंजीव पुरुषोत्तमजीचे पत्रीं लिहिलें त्यावरून कळलें. तुह्मी आपलें कामकाज घरचें बहुत शाहाणपणें करीत जाणें. तुह्मांकरितां आह्मीं बेफिकीर आहों. श्रीमंताचा जिनस तुह्मांस लिहिले होते की राजश्री बाळाजी शामराज येतील ते घेऊन जातील. त्यावरून तुह्मी राहिलेस. बाळाजीपंतासही गुतां ग्वालेरीचे कामकाजाचा पडला. बरें ! आतां आह्मीच येणार आहों. न कळे, श्रीमंत तेथून स्वार जाले, गांठ कोणें ठिकाणीं पडेल. त्यांच्या समयास जिनस पावता तर उत्तम होते. आतां ते गोष्ट राहिली. जैसे होईल तैसे पाहातों. तेथे लोकांकडे गुतां दिंडोरकर देशमुख व दादो उद्धव यांजकडे रु॥ आहेत ते मागून घेणें. रोखे पत्रमनास आणून ज्यांपासी तगादा असेल तो उगऊन घेणे. घरचा बंदोबस्त उत्तम प्रकारें राखणें. केवळ लेकरांचे भरंवसियावर न जाणें. * बहुत काय लिहिणें हे विनंती.

से॥ वेणाजी त्रिंबक स॥ नमस्कार विनंती उपरी. तुह्मी पत्र प॥ तें पावलें. सदैव पत्रीं सांभाल करीत जाणें. घरचा समाचार घेत जाणें. कृपा लोभ असो दीजे. हे विनंती.

॥ श्री ॥

शके १६६६, आश्विन वद्य ३

राजश्री पिलाजी जाधवराऊ गोसावी यासी.

अखंडित लक्ष्मि अलंकृत राजमान्य स्ने॥ बसवंतराऊ खासखेल रामराम विनंति येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पवोन बहुत समाधान जाहालें. ऐसेंच सदैव पत्र पाठवून परामृश करीत गेलें पाहिजें. आपणांस नारू जाहाले आहेत ह्मणून लिहिलें. तेणेंकरून चित्तास फारसे श्रम जाहले. बरे शरीर भोगास उपाय काय आहे ? सत्वर वोषधी उपाय करून बरें करून घेऊन आरोग्यतेचें पत्र पाठविलें पाहिजे; तेणें करून चितास संतोष होईल. आपल्या दर्शनाचा हेत बहुत आहे. भेट होईल तो दिन सुदिन असे ! दरबारचें वर्तमान प्रस्तुत यथास्थित असे. पुजाजी जासुद याबरोबर वर्षासनाबाबत रुपये ३०० तीनशें पाठविले ते पावले. कळलें पाहिजे. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.

वर्षासन सन खमस ११५४ पाठविलें—त्याची पावती आली छ. १७ रमजान.

॥ श्री॥

शके १६६६ अधिक आषाढ़ शुद्ध १३

पुरवणी राजश्री बापूजी महादेव गोसावी यांसी:---

उपरी. फर्मासी जिन्नस पिशावरी अत्तर व लाहुरी लगाम व मुलतानी लांबोडी कमाना वगैरे विषयीं वारंवार तुह्मास लिहिलेंच आहे. तर फर्मासी जिन्नस पत्र पावतांच पाठवून देणे. जाणिजे, ते प्रांतीचा अपूर्व जिनस जरूर मेळवणे. छ ११ माहे जमादिदावल. +

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries