Super User

Super User

॥ श्री ॥ शके १६७० श्रावण वद्य १३

+ + + + + दिनचर्येचें वर्तमान सविस्तर लिहावें ह्मणून लिहिलें. ऐशास, राजश्री गंगाधरपंत फौजेसहित पुढें पाठविले होते. कछवियाची हि फौज बाहेर चालून आली. दोही फौजेचा मुकाबला होऊन युद्ध जालें; व रजपूत सिकंदे वरून जैपुरापाशी नेऊन घातले. त्याउपरि राजे ईश्वरसिंग तमाम फौजेसुद्धां बाहेर निघाले आह्मीं हि तयार होऊन गेलों. त्यांचा आमचा मुकाबला होऊन, चार घटका युद्ध जालें. सेखावते व नरोके जाट मोडून ताराज केले. राजियाच्या हत्तीपावेतों मारीत आपले लोक गेले. रजपूत बहुत सिकंदे केले. रोज कोसभर चालूं पावलें नाहींत. त्यांच्या लष्करांत दाणा, वैरण, फाटीं बहुत दुर्भिक्ष. साधे रोजीं मौजे बागरास येऊन त्यांचा मुकाम जाला. तेथें बेहिमत कछवे बहुत जाले. संकट त्यांनी जाणून, रा॥ केशोदास सलुखाबद्दल आह्माकडे पाठवून, रदबदल करून, बुंदी सोडून देतो, माधोसिंगाचे चारी परगणे अगदी खाली करून निखालस देतों, ऐसा करार कबूल केला. तेव्हां आजी श्रावण + + द्वादशीस राजे ईश्वरसिंग या + + + + + + + +  *

२४९ हिंगणे   ॥ श्री ॥

शके १६७० श्रावणवद्य १३         पौ। छ ३० शाबान.

राजश्री बापूजी महादेव व राजश्री दामोदर महादेव गोसावी यासीः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥.

मलारजी होळकर दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणऊन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन अर्थ ध्यानास आला. दिल्लीचें सविस्तरें राजचर्येचें वर्तमान लिहिलें; आणि सादतखानाच्या मर्जी कुमक च्यारपाच हजारांची पाठवावीं ऐसीं घेऊन ठेविलीं. प्रतिउत्तर आलिया तजवीज करून. ह्मणून पत्रीं लेखन केलें. ऐशास, आपले स्वहिताचा मनसबा देखिला, तो तुह्मी त्यांची मर्जी घेतली हे गोष्टी प्रसंगास उचितच आहे. इकडील वृत्तांत तरी:- पूर्वी या प्रांतास आलिया दोन तीन पत्रें तुह्मांस लिहिलीं त्यावरून अर्थ कळलाच असेल. राजे ईश्वरसिंग यांणी लटकी रदबदल दोन महिने लावून आपल्या फौजा तमाम मेळवून युद्धप्रसंग करावा ऐसा त्यांचा विचार देखोन, रा॥ गंगाधरपंत याजबरोबर फौज देऊन फागईच्या मुकामीहून जैपुरास रवाना केलें. त्यासी. आषाढ वा। २ स आपली फौज जाऊन, शह-सभोंवती उभी राहून, भोंवताल्या वाड्या होत्या त्या जाळून दोन प्रहर तालिया तेथून दोन कोस अलीकडे येऊन मुकाम केला. त्यासी, राजियाचें जाट, सेखावद, नरोके, राजावत, व राय केशवदास अवघे सरदार याजबराबर फौज देऊन, आपली फौज राहिली होती तेथें चालून आलें. आपली फौज तयार होऊन, दोहीं फौजांसी गाठ पडून युद्ध चार घटका जालें. आपल्या कडील +++ कामास आला. आणखी चांगले माणूस त्याजकडील शेदीडशे ठार जालें, दोनतीनशे जखमी जाले. कछवे सिकंदे करून, माघारे जैपुराशेजारी नेऊन घातले. तेव्हां त्याजला भारी मनसबा पडून, अवघे सरदार, ठाकूर, राजा, एकत्र होऊन, मसलत ठरावून, खासी राजे यांणी बाहेर निघावे, ऐसा निश्चय करून आषाढ व॥ ६ स बाहेर राजे ईश्वरसिंग निघाले. यापरि, जालें वर्तमान पुरवणी पत्रीं लिहिलें आहे त्यावरून कळों येईल. छ २५ शाबान. बहुत काय लिहिणें ? हे विनंति

॥ श्री ॥

शके १६७० वैशाख वद्य १

राजश्री याविराजित राजमान्य राजश्री दामोधर महादेव गोसावी यांसिः--

सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहिणें. विशेंष. प्रं॥ ग्वालेर येथील फौजदारी बाबत सन सबाचा इजार रुपये १००००० एक लक्ष राजश्री बापूजी महादेव याजकडे दिल्लीस राजश्री विठल शिवदेव व राजश्री अंताजी माणकेश्वर यांणीं द्यावे ते हल्ली तुह्मांकडून देविले असते. तरी राजश्री सवाई ईश्वरासिंग याजकडील मेजावानीपैकीं एक लक्ष रुपये आश्विन शुद्र प्रतीपदेस सन तिसा अर्बैनांत देविले ते देणें. जाणिजे. छ १५ जमादिलावल, सु॥ समान अर्बैन मया व  * अलफ, बहुत काय लिहिणें ?

(लेखन सीमा )

                                                                                   लेखांक २४४

                                                                                               श्रीमार्तंडप्रसन

तीर्थरूप राजश्री                                      बावा गोसावी वस्ती का। नीब  वडीलाचे सेवेसी

अपत्ये खेलोजी गावडे देसाई ता। सातारा पायावरी डोई ठेऊन दंडवत विनंति उपेरी आमचे विसि सांगोन पाठविले तरी स्वामीनी हर एकविसी आमचे धोका न धरिजे आह्मापासून सहसा चाकरीस अंतर पडणार नाही परत फौज ये प्राती आहे तो तुह्मी गावावरी न राहाणे गुरे थाटे न ठेवणे खाबरदार राहाणे विशेश लेहू तरी स्वामी वडील आहेत हे विनंति

मोर्तब
सूद

पुरवणी १०५

॥ श्री ॥

शक १६६९

चिरंजीव राजश्री नाना यासी प्रति जनार्दन बाजी आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जाणें. विशेष. तुह्मांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी, सदैव पत्र पाठवून संतोषवित गेलें पाहिजे. तीर्थरूप मंगळवारी बाहेर निघाले; आह्मीहि बरोबर निघालों. काय विचार काही कळलाच नाहीं. आमचे मतें तर उगीच भयप्रदर्शन करावें कीं, नासरजंग बाहेर निघाला. भाऊस देखील बाहेर निघावें लागलें. ऐश्या एकट्यानें करून निकाल काढावा, ऐसें आमचे मतें वाटतें. परंतु, तुह्मी काय मजकुर तो लिहून पाठविणें. विशेष काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.

पुरंदरे ३३                  ॥ श्री ॥                     १६६९

राजमान्य राजश्री त्रिंबकराव सोमवंशी सरलष्कर यासी आज्ञा केली ऐसीजेः-

तुह्मी विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत जाला. वसंतगड यातील प्यादे यास कौल देऊन बाहेर काढले, गाव घेतला, ह्मणून लिहिलें तें विदित जालें. प्यादे यांस कौल देऊन काढावयाचे नव्हते. कापून काढले असतें तरी पुढें दहशत पडती. ती गोष्ट न केली ! बरें ! जालें तें जालें ! पुढें दहशत पडोन स्वामिकार्य सिद्धीस पावें ते गोष्टी करणें. पुढील कर्तव्यविचार सर्वांचे विचारें करून, राहिलीं स्थलें हस्तगत होऊन, उदाजीचा निःपात होय ते गोष्ट करणें. जेणेंकडोन स्वामिकार्य होऊन तुमचा नक्ष होय, स्वामी तुह्मांवर संतोषी होत, ते गोष्ट करणे.  * सुदन असा.

॥ श्री ॥

शक १६६९ माघ शुद्ध १३

राजश्री पिलाजी जाधवराव गोसावीं यासीं :--

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥
बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. पत्र छ १० सफरचें पाठविलें तेंछ १२ मानहूस पावलें, लिहला अर्थ कळला. तुमच्या लिहिल्या प्रो। घाटाघर मुकाम होईल. व रा॥ बगाजी यादव यास आजीच रा॥ करून तुह्मीं तेथील वर्तमान लिहित जाणें. जाणिजे. चंद्र १२ सफर. काल बगाजीपंत खिजमतगार यांनी सर्व वर्तमान सांगितलें. येथून जें सांगणें तें आज यास सांगून, रवाना करून, सत्वरच तेथें पावतील. सक्स्तिर सांगतील तें ध्यानांत आणून करावें. सर्व गोष्टींत हेळसांड, व वार्यावर वरात, नवाब दूरंदेश असतां, व आह्मी तिळमात्र हाकाळवर अंतर आपलें तर्फेनें केलें नसतां, दाखवावी हें उचित नाहीं. नासरजंग बाहेर निघणार, या दबावानें कूच करून आह्मी पुढें गेलों तर, आह्मांस कोण पुढें पुसलें पाहिजे. अवाईनें व दबावणीनें कूच करून, दूर पळून जावयाजोगे असतील, त्यास मोगलाई आविर्भाव दाखवावे ! आह्मी सर्व प्रकारें श्रेय इच्छितं असंता एकाएकी पुढे आले; गरीब रयत लोक पळाली; आह्मांवर दबाव दिल्हा; माघारे हि गेलें. याप्रो। करणें हे स्नेहाचे रीतीस बरे दिसत नाही. पुढेहि दुरंदेशी ध्यानांत आणून, पोख्ती विच्यार करून, आमचें समाधान, रक्षून करावें. न करीत तर न करोत ! किल्ला आमचा नवाबांनी घेतली. पुढें एकाएकीं येऊन दबावहि नवाबांनीच दाखविला. सांप्रतहि स्नेहाविसीं पुर्ता आदर दिसत नाहीं. तर वरकडाप्र॥ केवळ आमची हेळसांड करावी हें त्यास उत्तम नाहीं. कोणाचा काय वकूब व प्रमाणिकता, हे नवाब पुर्ते जाणतात. सविस्तर बगाजीपंत सत्वरच येऊन आपणास सांगतील.

( लेखनसीमा )

३७

॥श्री ॥

शके १६६९ माघ शुद्ध ९

राजश्री पिलाजी जाधवराव गोसावी यासी:-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने॥

बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. तुह्मी पत्र छ सफरचें पाठविलें ते छ ७ मीनहूस प्रविष्ट जालें. नवाबाची आमची बोली ज़ाली. नवाब ह्मणाले कीं, आमच्या चित्तांत बिघाडाचा मजकूर किमपि नाही; आह्मी हवेली दाखल जाहलों. अतःपर पंतप्रधानांनी आपल्या कार्यास जावे. ह्मणाले येथें विनाकार्य उगेंच राहून नफा काय आहे ? राहावें ऐसा अर्थ नाहीं. आज्ञा जाहल्यास आह्मी नवाबाचा निरोप घेऊन येऊन. ह्मणोन लिहिलें तें कळलें. ऐशास, नवाब बोलले तें यथार्थ आहे. त्यांच्या चित्तांत दुसरा अर्थ नाहीं. तदन्वयें आमचाहि नवाबासी दुसरा विचार काय आहे ? नवाबापासून उमदीं उमदीं कामें करून घ्यावीं हे उमेद आह्मास फार आहे; व आह्मांपासूनही बहुत कामें करवावीं हें नवाबासी जरूर आहे. ये समयीं न जाहलीं तर त्या गोष्टीवर मौकुफ काय असे ? नवाबाची आमची भेट व्हावी; परस्पर गोष्टमात होऊन, कितेक गोष्टी उभयपक्षीं नफ्याच्या व उपयोगाच्या व्हाव्या; त्या न जाल्यातर काय ? पुढें त्यांच्याच संतोषानरूप ज्या कालीं होणें त्या कालीं होतीलच. एतद्विषयीं तुह्मी नवाबास संतोष व उचित बोलणें तें बोलोन, नवाचा निरोप घेऊन येणें. उगेंच तेथें कशास राहणार ? आह्मी कोल्हार भगवती येथून कुच करून, पुणतांब्यावर जाऊन तेथून भादलीच्या ओढ्यावर जाऊन, तेथून कासारबारी उतरून जाऊन तर तुह्मी कासारबारीच्या रोखें येणें. जाणिजे. छ ७ सफर. बहुत काय लिहिणें ?

(लेखन सीमा )

                                                                                   लेखांक २४३

                                                                                                       श्री

राजश्री आनंदगीर गोसावियाचे सेवेसी

.5 उतमगुणपरिपूर्ण धर्मपरायण                   प्रति विठल यबाजी कुलकर्णी वा माहारोजी फालका वा गुराई वा कनकोजी साहता मौजे गोवे नारायण विनंति उपरी आह्मी साळवणात कीर्दी केली आहे त्यावरते देवाचे बागाचे धरण आहे ते नस्टाईने कोणीतरी धरण फोडून पाणी नास करितात त्यावरून तुह्मी आह्मास कीर्दीकरास जाणून बुधीसी लाविता तरी अजी पासून जोवरी आमचे कीर्दी आहे तोवरी चैत्र वैशाख जेस्टा पावेतो धरण जतन करून

विठल यवाजी                              कनकोजी साहता
१ ब्रहस्पतवार                              १ सनवार
१ सुक्रवार                                   १ आदितवार
-------                                    -------
२                                             २

माहारोजी                               गुसाईजी
१ सोमवार                              १ बुधवार
१ मंगलवार
-----

येणेप्रमाणे धरण जतन करून ज्याचे दिवसात फुटेल त्याने गोसावियाचे राहा करून गुन्हेगारी द्यावी हे पत्र सही

                                                                                   लेखांक २४२

                                                                                                       श्री

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री माणको गोविंद गोसावी यासि ता। रा। आणाजी जनार्दन सुभेदार प्रा वाई गोसावी यासि

सेवक परशराम त्र्यंबक नमस्कार उपर मौजे इडमिडे सुभा वाई हा गाव रा। सदानंद गोसावी यास इनाम आहे त्यास पेशजी वैराटगड घेतला ते समई मौजे मा।रीहून रुपये दोनीसे घेतले व त्याउपरी सिलेमानखानास भेटावयास गेला ह्मणून निमीत्य ठेऊन दोनीसे रुपये घेतले पुढेही साप्रत उपद्रव देता ह्मणून कळो आले तरी ऐसी गोष्टी न करणे गाव गोसावी यास इनाम आहे त्यास सर्वथीव उपद्रव न देणें येविशीचा बोभाट येऊ न देणे जाणिजे छ २७ मोहरम निदेश समक्ष

 

राजते
लेखना
वधी


सुरुसुद

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries