पत्रांक ५९३

श्री
१७२४ श्रावण.
लक्ष्मी नारायण दीक्षित.

हरतर्फ एखलास चांदसाहेब दुवा आंकी. तुम्ही खत पाठविलें तें पावलें, गांडापुरीं ठाणें घेऊन आलां, म्हणोन ऐकिल्यावरून बहुत खुषी जाली. तुम्हीं आहां यांजवरून गांवास खातरजमा जाली. तुमचे भरवशियावर आहों. गांवची काळजी तुम्हांसच आहे. जानवी जोड ? पाठविला आहे. स्वार आा ५ माघारे पाले आहेत. काळे ढालाईत येथें ठेऊन घेतले. स्वारास तुमचें लिो प्रों दाणा व पोटास सिदा दिल्हा, मीरखां पठाण कोणीकडे जाणार हें ल्याहावें. कायगांवची सर्वोपरीं तुम्हांस काळजी आहे. ज्यादा काय लिहिणें ? सिदोजी पाठविले आहेत. जबानीं सांगतां कळेल. हे किताबत.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries