Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

१ वैशाख शुध्द दशमीस वे|| केसोभटजीची व शास्त्रीबाबांची वाड्यांत गांठ पडली. ते समई भटजींनी बाबांस विचारिले की, आम्हांस आपले घरचा व त्यांचा परामृश करावयासी चासेच जाणे आहे, जाऊन येऊ. तेव्हा बाबांनी सांगितले की, चासकरांचे काम तुमचे मार्फतीने विल्हेस लाविले पाहिजे, तुम्ही गेल्यावर कैसे होईलॽ त्यास भटजी बोलले की, आपण लवकरच विचारांत आणीत असिला तरी चार दिवस राहू, पुढे पर्जन्यकाल समीप आला, जाणे जरूर आहे. त्यास बाबा बोलले की, तीन दिवसांत येकदोघेजण गृहस्थ व तुम्ही आम्ही येकीकडे बसून पत्रे पाहू व बोलणेही बोलू. त्यास गृहस्थ कोण, रा त्रिंबकपंत व विठ्ठलपंत. त्यास उत्तम म्हणोन उठिले. त्याजवर येकीकडे दोन दिवसांनी बसून देवघरांत पत्रे फिरोन पाहिली. बोलणे झाले. भटजींनी विचारिले की, अवकाश पडतो, आम्हांस जाऊन येऊ द्यावे. त्यास बाबांनी सांगितले की, पांचवे दिवशी जाऊन यावे, हे काम व आणखी सरकारी काम तुम्हाजवळ आहे. त्याप्रमाणे भटजींनी मान्य केले की, जाऊन येतो, त्यास चासकरांकडील कारकूनही आमचे समागमेच जाऊन येईल, त्यांचे बोलणे आम्ही माहीतगारीने बोलत आहो, त्यास मागती तेथे मातुश्री रखमाबाईस साकल्य पुसोन घेऊ. त्यास बाबा बोलले की, कारकुनास निरोप देत नाही, आणखी एक वेळ बसून विचार केला पाहिजे. त्याजवर मागती सांगितले की, हरिपंती रा त्रिंबकपंताकडे जाऊन वर्तमानपत्राप्रमाणे साकल्य समजवावे, यास चार दिवस लागतील, तो आपण जाऊनही याल, तुम्ही आल्यावाचून मागती था-यास बसत नाही. ऐसे शास्त्रीबाबांनी सांगितले. त्याजवर पत्रे रा त्रिंबकपंताचे घरी नेऊन दाखविली. वर्तमान समजाविले. वैशाख वा ९ नवमीस जावे आणि अमावस्येस यावे, ऐसे सांगितले. त्याप्रो व १० दशमी सोमवारी दोन प्रहरानंतर भटजी निघोन चासेस आले.

१ मागती जेष्ठ शुध्द १ प्रतिपदेस भटजी माघारे पुणियास गेले. तेथे गेल्यावर शुध्द ८ अष्टमीस वाड्यांत भटजीस व हरिसिध्देश्र्वर यांस बोलावून नेले. तेथे शास्त्रीबाबांनी सांगितले की, अस्सल पत्रे आणावी, मेघःश्यामपंताचे बोलणे आहे, नकलांवर शेवट कैसा होतो, वाद्याची निशा पडत नाही. त्याजवर विनंति केली की, आपल्याजवळ कोण्ही अस्सल पत्रे आणील की काय, नकलांवरून निवाडा करावा, उपरांतिक अस्सल पत्रेही आपल्या विचारे असल्यास दृष्टीस पडतील, हाली विल्हेस पत्रे आहेत. त्याजवर बाबांनी रा त्रिंबकपंतास सांगितले की, हरिपंत पत्रे घेऊन तुमचे घरास येतील, पत्रे पाहून त्यांतील सारांश निवडून काढणे, सारांश जहाल्यावर एक वेळ बसून पंचाईत करू. त्याजवर रा त्रिंबकपंताकडे पत्रे घेऊन हरि सिध्देश्र्वर गेले. पत्रे पाहिली. मेघःश्यामपंतांनी सरकारांत याद लिहून दिल्ही होती तीसी पत्रे रुजू घातली. मेघःश्यामपंतांनी सरकारांत याद लिहून दिल्ही होती तीसी पत्रे रुजू घातली. बाकी पत्रे का आणली नाहीत, म्हणून पुशिले. त्याचे उत्तर केले की, आम्हांस त्यांचे यादीसी प्रयोजन काय, त्यांचा आमचा संबंध काय, जी पत्रे होती ती आणली आहेत. त्याजवर ते बोलले की, याद लिहून देणे. त्यास यादीत जी पत्रे होती त्यांची नावनिसी व मित्ती घालून लिहून दिल्ही नवती, ती अस्सल नाहीत म्हणून लिहून दिल्हे. त्याजवर जी पत्रे होती त्यांतील सारांश लिहून काढिला. पत्रे माघारे दिल्ही, त्यांची नक्कल लिहून घेतली आहे. येणेप्रमाणे वर्तमान जेष्ठ शुध्द अष्टमीस वाड्यांत ठरले आणि द्वादशीस सारांश रा त्रिंबकपंताचे घरी लिहून ठेविला.