Super User

Super User

इ. इ. इ. येणेप्रमाणे हे सर्व शब्द वचन, लिंग किंवा विभक्ती यांच्या प्रत्ययांखेरीज जसेच्या तसे योजता येतात. वैदिकभाषेत हे अव्यय शब्द का आले याचे कारण या शब्दासंबंधाने आर्यांच्या मनात असलेला धर्म ह्न विषयक पूज्यभाव. हे सर्व शब्द आर्यांच्या धर्मखात्यातील म्हणजे यज्ञप्रकरणातील आहेत. तेव्हा ते जसेच्या तसे योजण्यात मंत्रसामर्थ्य विशेष असणार या भावनेने हे शब्द पिढ्या न पिढ्या जसेच्यातसे वैदिककाळापर्यंत उतरले, त्यांच्यात अणुमात्र फेरफार झाला नाही व खपला नसता. या धार्मिक भावनेमुळे, शाब्दिक व वैय्याकरण जे आहेत त्यांचा , मात्र, सद्य:काळी फार फायदा झाला आहे. त्यांना वैदिक आर्यांचे पूर्वज अत्यंत प्राथमिक अवस्थेत वचथप्रत्ययांशिवाय, लिंगप्रत्ययांशिवाय व विभक्तिप्रत्ययांशिवाय, लिंगप्रत्ययींशिवाय व विभक्तिप्रत्ययांशिवाय कसे बोलत असतील त्याचा थोडासा मासला या धार्मिक भावनेच्या द्वारा अद्यापही प्रत्यक्ष पहावयास मिळतो, केवळ अनुमानधपक्यावर विसंबण्याची आपत्ती ओढवत नाही !

खोट १ [ घुंटिः, घुटिः = खोट, घोटा ]

-२ [ घोट शब्दाचें दुसरें रूप ] (स. मं.)

-३ [ क्षोट ] ( खोटें १ पहा)

-४ [ (कूट ) कौट = खोट (टा-टी-टें) ] (भा. इ. १८३५ )

खोटें १ [ क्षोट (क्षये ) = खोट = खोटँ = खोटें ( क्षय पावणारें) खोट = नुकसान ] (ग्रंथमाला)

-२ [ कूट = खूट = खोट (टें, टा, टी ) ( असत्य ) ] (भा. इ. १८३२ )

खोटें-टा-टी [ खरेंकुडें असा जोडशब्द मजजवळील मुकुंदराजी ज्ञानेश्वरींत येतो. कचा ख होऊन व डचा ट होऊन कुड = खुट = खोट (टा-टी-टें). ड चा र होऊन खुर ( रा-री-रें) खरेंखुरें ] ( भा. इ. १८३२)

खोड १ [ खोड् to be lame, खोडिः lameness, fault, failing = खोड ] a fault, a bad habit.

-२ [ खोडता = खोडी, खोड ( व्यंगता ) ]

-३ [ कुड् to play like a child, कुडी N. = खोड, खोडकर, खोडी ]

खोंड १ [ षोडन् = खोड = खोंड ] सहा दांत ज्याला आले आहेत तो बैल म्ह० खोंड.

-२ [ षंड = खोंड ( तरुण बैल). षंडः स्मृतो बलीवर्दे ]

खोडकर [ कुड् to play like a child, कुडी N. ] ( खोड ३ पहा)

खोडणें [ खुड् to break in pieces = खोडणें. खुंड् to break in pieces = खुडणें, खुंडणें, खुंटणें, खुंटणें ] खोडसाळ [ कूटशाल: ] खोट्या शाळेचा, चालीचा. (भा. इ. १८३५ व चिठ्ठी)

खोडा [ खोर:, खोल: = खेडा ] खोडा म्ह० प्रतिबंध.

खोडाखोड [खोराखेरिः = खोडाखोड. खोर् गतिप्रतिघाते] खोडाखोड म्ह० लिहिण्याच्या गतींत प्रतिघात.

यादृष्टीने पहाता, ममार व ददौ यातील अ व औ हे प्रत्यय भूतार्थक जितके आहेत तितकेच वर्तमानार्थक व आज्ञार्थक आहेत. म्हणजे हे प्रत्यय कोणताच अर्थ दाखवीत नाहीत. दुसऱ्या शब्दांनी सांगावयाचे म्हणजे हे प्रत्यय काल किंवा अर्थ दाखविणारे नाहीत, हे प्रत्यय फक्त सर्वनामे आहेत. लिट् मधील अ किंवा औ चा जो प्रकार तो च लुङ् व लङ् मधील अम् चा प्रकार. अम कोणताच काल किंवा अर्थ दाखवीत नाही, भूतकालही दाखवीत नाही वर्तमानकालही दाखवीत नाही. अम् हे निव्वळ, साधे, पूर्ववैदिक सर्वनाम आहे. जशी आमि, मि, अ व औ ही पूर्ववैदिक सर्वनामरूपे आहेत, तसेच अम् हेही पूर्ववैदिक सर्वनामरूप आहे. जसे आमि स्वतंत्रपणे धातूच्या पुढे येते. तसेच अम् ही स्वतंत्रपणे आमि चा अपभ्रंश म्हणून नव्हे, धातूच्या पुढे येते. यावर कोणी असा आक्षेप आणील की आमि वर अम् हे प्रत्यय किंवा सर्वनामे जर भूत, वर्तमान, आज्ञा, संकेत इत्यादी अर्थ दाखवीत नाहीत तर हे अर्थ कशाने दाखविले जातात? या आक्षेपाचे निरसन करावयाचे म्हणजे संस्कृतातील धातूंचे वर्गीकरण मुळात काय होते ते सांगावयाचे. ओघासच आले आहे, सबब वर्गीकरण काय होते ते सांगतो. परंतु धातूंच्या वर्गीकरणाच्या व पृथक्करणाच्या दीर्घ उद्योगाला लागण्यापूर्वी म्हणजे पाणिनी जिला तिङन्त प्रक्रिया म्हणतो तिचा उलगडा करण्याचा प्रयत्न आरंभिण्यापूर्वीं, येथपर्यत ज्या सुबंत प्रकरणाचे प्रामुख्येकरून विवेचन केले त्यातील अद्यापपर्यत स्पर्श न केलेल्या एक-दोन बाबींचा उल्लेख करतो व नंतर सगळ्या विवेचनाचा संक्षिप्त कलमवार आढावा घेतो.

४२ वचन, लिंग व विभक्ती यांचे प्रत्यय ज्या शब्दांना लागतात त्या संबंधाने ऊहापोह येथपर्यंत केला. आता वैदिकभाषेत पूर्ववैदिकभाषातून आलेल्या अशा शब्दांचा नामनिर्देश करतो की ज्यांना वचन, लिंग किंवा विभक्ती यांचे प्रत्यय लागत नाहीत आणि म्हणून ज्यांना अव्यय व नियात या संज्ञा मिळालेल्या आहेत. असे अव्यय शब्द किंवा नामे म्हटली म्हणजे भूर्, भुवर्, स्वर्, वदि, सुदि, स्वाहा, स्वधा, संवत, चमस्, नमस्, ओम् इत्यादी होत. जेव्हा वैदिकभाषेच्या पूर्वजभाषात विभक्त्या, लिंग व वचने यांचे प्रत्यय नव्हते तेव्हाचे ते अत्यंत जुनाट प्राथमिक शब्द आहेत. या अव्यय नामांवरून तत्कालीन आर्यपूर्वजांची संस्कृती कळण्यास मार्ग होतो, भूर, भुवर्, स्वर हे देवांचे तीन लोक आर्यपूर्वजांना माहीत होते. शोभनो दिव: सुदि, म्हणजे रात्री आकाशात उजेड ज्या पंधरवाड्यात असतो त्या पंधरवड्याला ते सुदी म्हणत. ज्या पंधरवड्यात उजेड नसतो त्याला (अव दिव: =(अलोप)) वदी म्हणत. चांगले आणि वाईट, शोभन आणि अशोभन दिव: म्हणजे द्यौ: म्हणजे आकाश ज्यात असते त्याला ते संवत् (सं च अव च दिव:) संवद् (म्हणजे संवत्सर) म्हणत. चम् (खाणे) पासून चमस् (अन्न) व नम् पासून नमस्, शब्द निघाला आहे. स्वाहा, स्वधा व ओम् ही नामे प्रसिद्धच आहेत. साऱ्या वचनी, लिंगी व विभक्त्यात हे शब्द अव्यय रहातात. उदाहरणार्थ सुदी शब्द घ्या. त्याचा उपयोग असा करीत :
श्रावणंसुदि चतुर्थी (प्रथमा एकवचन)
श्रावणसुदि चतुर्थी पंचम्यौ ( प्रथमा द्विवचन)
श्रावणसुदि पंचम्यां (सप्तमी एकवचन)
श्रावणसुदि प्रथमरविवासर: (पुल्लिंग)
श्रावणसुदि प्रथमद्वितीयाहीन (नपुंसक द्विवचन)

शिवाय असेही जर दाखविता आले की अ हे रूप सर्वात प्राचीन आहे, तर गलन्ती पक्षाला वर तोंड काढावयाला जागाही रहात नाही. समर्थनार्थ, आमि, मि व अम ही सर्वनामे समकालीन आहेत की विषमकालीन आहेत ते पाहू. वदामि व वेद्मि या दोन रूपात आमि व मि ही दोन सर्वनामे आहेत व ती एकाचकाळी प्रचलित होती. पैकी आमि जुने म्हणण्यास व मि नवे म्हणण्यास काहीच प्रमाण नाही. वैदिक लेट् घ्या. इत श्च लोप: परस्पैपदेषु, या सूत्रात पाणिनी सांगतो की, लेटांत परस्मायक प्रत्ययांतील इ चा लोप विकल्पाने होतो. म्हणजे मि व म, सि व स्, ति व त् असे दोन प्रकार प्रत्ययांचे होतात. पैकी मि जुना व म नवा म्हणण्यास काहीच आधार नाही. दोन्ही समकालीन आहेत आणि जर काहीचा आधार नाही, तर मि चा म् होण्यास हजार-पंधराशे वर्षाचा कालावधी कोठून काढावयाच? कोणी म्हणेल की अन्त्य स्वरांचा व व्यजनांचा लोप करण्याकडे सर्व भाषांची प्रवृत्ती दिसते; तद्वत् मि तील इ चा लोप झाला. होय, अशी प्रवृत्ती भाषात दिसते. परंतु, ही प्रवृत्ती समकालीन नसते, हजार पंधराशे वर्षांच्या कालावधीने अंतरित असते. हा कालावधी मि चा म् व्हावयाला उपलब्ध नाही. सबब, मि चा म् झालेला नाही व आमि चा अम् झालेला नाही. दोन्ही स्वतंत्र आहेत व समकालीन आहेत. वैदिक लेट् व लुङ् घ्या. तारिषम् व अतारिषम् अशी लेट्ची व लुङ् ची रूपे आहेत. मूळ तृ धातु. त्याला सिप् होऊन तारिष असे अंग झाले. नंतर अम् प्रत्यय लागून तारिषम् रूप झाले आणि अ उपसर्ग व अम् प्रत्यय लागून अतारिषम् रूप झाले. तारिषम् लिङथर्क आहे व अतारिषम् भूतार्थक आहे. येथे दोन्ही रूपात अम् हा प्रत्यय आहे. अम् हा प्रत्यय भूतार्थक लुङ् चा च तेवढा आहे असे नाही, लिङर्थक लेट् चाही आहे. तारिषम् व अतारिषम् ही दोन्ही रूपे, शिवाय, समकालीन आहेत कोणी असे म्हणेल की, अम् हा प्रत्यय भूतकालदर्शक आहे व आमि हा प्रत्यय वर्तमानकालदर्शक आहे. तर हेही म्हणणे टिकण्यासारखे नाही. लेट्, विधिलिङ् व अशीर्लिङ् यामध्ये अम् प्रत्यय लागतो, आणि लेट् व लिङ् हे लकार काही भूतार्थक नाहीत. ही इतकी कारणे मि व अम् ही रूपे आमि चे अपभ्रंश नाहीत, हे सिद्ध करण्यास पुरे आहेत. आता, अ व औ ही रूपे आमि चे अपभ्रंश आहेत की काय ते तपासू. चकर् अंगाला अ सर्वनाम लागून चकर रूप होते. चकर हे रूप पूर्ववैदिक भाषात केवळ भूतकालदर्शकच तेवढे नसे, वर्तमानकालदर्शकही असे. वैदिक भाषेतही चकर भूतार्थी, वर्तमानार्थी व भविष्यार्थीही योजिले जात असे. हे स्वच्छ सांगण्याकरता पाणिनीने छंदसि लुङ्लङलिट: हे सूत्र रचिले. या सूत्रात असे सांगितले आहे की, छंदोभाषेत लुङ्, लङ् आणि लिट् हे भूत, भविष्य, वर्तमान, आज्ञार्थ, संकेतार्थक वगैरे वाटेल त्याअर्थी योजिले जातात. उदाहरणार्थ, अद्य ममार हा प्रयोग पाणिनीय भाषेतील अद्य म्रियते या वाक्याप्रमाणे वर्तमानकालवाचक आहे. लक्षणेने वर्तमानकालवाचक आहे, असे सांगण्याचा पाणिनीचा हेतू नाही, तर वाच्यार्थाने वर्तमानकालवाचक म्हणजे लङर्थक आहे असा पाणिनीचा आशय आहे.

परस्मै आणि आत्मने मिळून एकंदर ३१ रूपे आहेत. यका एकतिसात दोन भेद अगदी सकृद्दर्शनीं पडतात. परस्मायक रूपे आत्मनायक रूपे. परस्मायक रूपात सहा उपभेद आहेत व आत्मनायक रूपात पाच उपभेद आहेत. मिळून एकंदर अकरा भेद होतात. ही अकरा रूपे अगदी स्वतंत्र सर्वनामे आहेत. कोणतेही रूप कोणत्याही दुसऱ्या रूपाचा अपभ्रंश नाही, असे निश्चयात्मक विधान करण्यास कारणे आहेत. आनि, आमि, मि, अम्, अ व औ या सहा प्रत्ययांपैकी आमि हा प्रत्यय मूळ धरून, बाकीचे प्रत्यय त्याचे अपभ्रंश आहेत, अशी कित्येक भाषाशास्त्रज्ञांची समजूत आहे. पैकी आमि चे आनि रूप का होते हे त्यांना नीट सांगता येत नाही. आज्ञार्थ दाखविण्याकरिता, म चा न केला, असे ते म्हणतात. तसेच, आमि तील आ काढून टाकून मि बनविला, आ चा अ करून व इ काढून टाकून आमि चे अम् झाले व अम् चा म् लोप होऊन अ झाला इत्यादी चर्पटपंजरी हे लोक करतात. या चर्पटपंजरीत ऱ्हस्वीकरण, अन्त्यलोप वगैरे नवी नवी नांवेही या लोकांनी बनविली आहेत. परंतु, या चर्पटपंजरीत विशेष अर्थ नाही. इ गळून, म् गळून व आद्य आ चा अ होऊन, आमि चा अ झाला, हे विधान करणाऱ्याला असे दाखविता आले पाहिजे की, १) आमि हे सर्वनामरूप मि, अम्, अ व औ या सर्वांच्याहून आधीचे आहे, २) इ गळून जाण्याला हजार पांचशे वर्षें गेली पाहिजेत, ३) म् गळून जाण्याला तितकाच वेळ गेला पाहिजे आणि ४) आ नाहीसा व्हावयाला आणिक तितकाच वेळ गेला पाहिजे. या चार बाबी आदौ सिद्ध करून नंतर, ५) विधान करणाऱ्याला असेही दाखविता आले पाहिजे की, आमि, आम्, आ यांच्यापैकी कोणतेही पूर्व-पूर्व रूप भाषेत जारीने प्रचलित नसून फक्त अ हे रूप भाषेत प्रचलित आहे. यापैकी कोणती एकही बाब सिद्ध न करता, अमुक गळाले, तमुक गळाले, वगैरे नुसती गलन्ती सांगणाऱ्या भाषाविचक्षणाच्या विधानांवर विचारवंतांचा बिलकुल विश्वास बसणार नाही. तशांत असे जर उलटपक्षी दाखवून देता आले की, मि, आमि व अम् ही रूपे एकाच काळी एकाच अर्थी योजिली जात असत, तर वरील गलन्तीचा पक्काच पचंबा उडतो.

वैदिक अहम् हे एकच रूप आहे. परंतु, पूर्ववैदिक १ आमि, २ मि, ३ अस्, ४ अ, ५ औ, ६ आनि, ७ ए, ८ इ, ९ ऐ अशी रूपे आहेत. तसेच, वैदिक त्वं हे एकच रूप आहे. परंतु पूर्ववैदिक १ स्, २ सि, ३ असि, ४ अस्, ५थ, ६ ह, ७ हि, ८ से, ९ थास्, १० स्व, अशी १० रूपे आहेत. याचा अर्थ काय? एकाच पूर्ववैदिक भाषेत अहम् हा अर्थ व्यक्त करण्याकरता ९ निरनिराळे प्रकार असत की काय? व त्वं हा अर्थ व्यक्त करण्याकरिता १० निरनिराळे प्रकार असत की काय? या प्रश्नाला उत्तर असे की पूर्ववैदिक एकच भाषा नव्हती, अनेक भाषा असत. त्या अनेक भाषांत फार प्राचीनकाळी ही दहा रूपे साक्षात नित्याच्या व्यवहारात बोलण्यात येत असत. पुरुषवाचकसर्वनामांच्या दृष्टीने पहाता, पूर्ववैदिकभाषांचे मोठे दोन वर्ग म्हटले म्हणजे आत्मनायक सर्वनामे योजिणाऱ्या भाषांचा पहिला वर्ग व परस्मायक सर्वनामे योजिणाऱ्या भाषांचा दुसरा वर्ग. आत्मनायक भाषांत तीन पोटभाषा असत; एक पोटभाषा अहमर्थक ए हे सर्वनाम योजी, दुसरी पोटभाषा इ हे सर्वनाम योजी आणि तिसरी पोटभाषा ऐ हे सर्वनाम योजी, परस्मायक भाषात सहा पोटभेद असत; एक पोटभाषा अहमर्थक आमि हे सर्वनाम योजी, दुसरी मि हे रूप योजी, तिसरी अम् हे रूप योजी, चवथी अ हे रूप योजी, पाचवी औ हे रूप योजी आणि सहावी आनि हें रूप योजी. १) वदामि, २) वेद्यि, ३) अवदम्, ४) उवाद, ५) ददौ, ६) वदानि, ७) वदे, ८) अवदे, ९) वदै, या नऊ रूपातील अहमर्थक आमि, मि, अम् इत्यादी शब्द एकाच भाषेने जरूर पडेल त्याप्रमाणे किंवा मनास वाटले त्या लहरीप्रमाणे मुद्दाम निर्माण केलेले नाहीत. वद्कपासून वदामि हे रूप योजिणाऱ्या भाषेला विद्पासून विदामि रूप खचित करता आले असते. तसेच, अवदामि, उवदामि, चकर्मि किंवा चकरामि, अशी आमि ह्न प्रत्ययान्त रूपे खचित बनविता आली असती. ती तशी एका साच्याची न बनता, वेद्मि, अवदम्, उवाद, चकर अशी भिन्नप्रत्ययान्त रूपे वैदिक भाषेत बनलेली आढळतात. वर्तमानकाली आमि, भूतकाली अम्, आज्ञार्थी आनि, लिटर्थी अ किंवा औ, हे प्रत्यय वैदिक ऋषींनीं एका काळी एका ठिकाणी बसून सर्वसंमतीने मुद्दाम बनविलेले नाहीत. भाषा अशा कृतक तऱ्हेने कधी बनत नसते. तसेच हजार पंधराशे वर्षात अन्त्य अक्षरांचा म्हणजे उच्चारांचा लोप किंवा बदल होऊन, आमि चे आनि किंवा औ कोणत्याही जादूने बनण्यासारखे नाही. तेव्हा, हे निरनिराळे प्रत्यय उप्तन्न होण्याचा एकच रस्ता रहातो. तो हा की, ही धातूंना लागणारी निरनिराळी सर्वनामरूपे वैदिक भाषेत तत्पूर्वकालीन अनेक भाषांतून आलेली आहेत दुसऱ्या एका रस्त्याने आपणाला याच अभ्युपगमाकडे यावे लागते. मूळचे वैदिक भाषेतील हे दहा लकार काय आहेत? वर्तमान, भूत, भविष्य, संकेत, आज्ञार्थ, विध्यर्थ, हे मुळात काय होते? पृथक्करण व अन्योन्य तुलना करून हे दहा लकार मुळात काय होते त्याचा छडा लावू.

४७ एकाच वैदिकभाषेत व्यावर्तक व समावर्तक अशी दोन प्रकारची सर्वनामे का असावी व आत्मनेपदी धातू व परस्मैपदी धातू असे धातूंचे दोन वर्ग का असावेत, या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, वैदिक समाज हा दोन पूर्ववैदिकसमाजाचे एकीकरण होऊन बनलेला मिश्र समाज होता. एका पूर्ववैदिकसमाजात फक्त आत्मनायक सर्वनामे असत व अर्थात आत्मनायक धातू असत. दुसऱ्या पूर्ववैदिकसमाजात फक्त परस्मायक सर्वनामे असत व अर्थात परस्मायक धातू असत. दोन्ही समाजाचे एकीकरण झाल्यावर मिश्र जी वैदिकभाषातीत दोन्ही प्रकारचे प्रयोग सहजच दिसू लागले व मिश्रभाषेला एक प्रकारचा विचित्रपणा आला. हा विचित्रपणा मिश्र समाजाच्या ध्यानात येऊन व उठल्या-बसल्या आत्मने आणि परस्मै रूपातील तारतम्याला जपत बसण्याचा वीट आल्यामुळे, पुढेपुढे दोन्ही रूपांचा उपयोग सरमिसळ एकाच अर्थाने होऊ लागला. परंतु, पाणिनीच्या काळापर्यत हा भेद भाषेत तीव्रतेने जागृत होता. कर्तरी प्रयोगात आत्मने व परस्मै हे तारतम्य पहाण्यात पुढेपुढे यद्यपि टंगळ-मंगळ होऊ लागली, तत्रापि आत्मनेचा अद्वितीय मान कर्मणी प्रयोगात जसाचा तसा कायम राहिला. क्रियाफल सदाच कर्तृगामी असल्यामुळे कर्मणीत परस्मैपद नाही. पाणिनीच्या काळी आस्मने व परस्मै हा भेद यद्यपि तीव्रतेने जागृत होता, तत्रापि पाणिनीच्या काळीसुद्धा लोक आत्मने व परस्मै यांची भेसळ मन मानेल तशी विकल्पाने करीत. यांची साक्ष खुद्द पाणिनीचीच देता येते. विभाषोपपदेन प्रतीयमाने, हे सूत्र पाणिनीने एवढ्याच करता रचले आहे. यजते म्हणजे स्वत: यज्ञ करतो. यजति म्हणजे दुसऱ्या करिता यज्ञ करितो. परंतु स्वयं हे उपपद जर वाक्यात घातले तर, यजते म्हणजे स्वत: करिता यज्ञ करतो याअर्थी स्वयं यजति असा परस्मायक प्रयोग पाणिनीच्या काळीही केला असता चालत असे. तात्पर्य, आत्मने आणि परस्मै हा भेद पाणिनीच्या काळीही किंचित मोडला जात असे, अशी जरी स्थिती होती, तत्रापि आत्मनेपदी रूपे टिकाव धरून पुष्कळ काळ राहिली. याची साक्ष वर्तमान मराठी भाषा देते. ज्ञानेश्वरीत करी हे परस्मै व उपकरे हे आत्मने रूप येते. वर्तमान मराठीत जेवे हे आत्मने व जेवी हे परस्मै रूप सध्याही आपण योजतो. एकंदरीत वांशिक स्वभाव जाता जात नाहीत व व्यसने सुटता सुटत नाहीत हेच खरे. कर्तृगामी क्रियाफल असते तेव्हा मराठीत मरे असे रूप होते आणि कर्त्रितरगामी जेव्हा क्रियाफल असते तेव्हा मारी असे रूप होते. ए आत्मनेची खूण आहे व ई परस्मैची खूण आहे.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries