Super User

Super User

[१२२]                                                                       श्री.                                                               ६ एप्रिल १७२५

राजश्री देशाधिकारी व लेखक वर्तमान व भावी तालुके सातारा व तालुके मेढे व तालुके कोरली गोसावी याशि  122 1अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्ये स्ने॥ श्रीनिवास परशराम प्रतिनिधी आशिरवाद व असामीस नमस्कार. सू॥ खंमस अशरीन मय्या व अलफ. राजश्री यादो गोपाळ यांनी हुजूर सातारियाचे मुक्कामी येऊन राजश्री स्वामीसंनिध विनंति केली कीं त॥ म॥र येथील खालशाचे जकातीचा ऐवज पूर्वीपासून आपल्या वेतनात पावत आहे. त्यास हल्लीं स्वामींनीं कृपाळू होऊन सदरहू जकातीचा ऐवज वेतनाखेरीज आपणास वंशपरंपरेने इनाम करून देऊन चालविलें पो. ह्मणोन त्यावरून राजश्री स्वामी याजवरी कृपाळू होऊन त्यास सदरहू तिन्ही महालांचा खालशाचे जकातीचा ऐवज दरोबस्त इनाम वंशपरंपरेने देऊन राजपत्रें आलाहिदा सादर जाहली आहेत, त्याप्रमाणें जकातीचा ऐवज आकारेल त्यापैकी- शिरस्त्याप्रमाणें हक्कदार व साहोत्रा वजा करून बाकी ऐवज राहील त्यापैकी स्वराज्याचा निमें ऐवज सरकारांत घेऊन बाकी खालशाचा निमे ऐवज मशारनिल्हे याजकडील कमावीसदारांकडे वसूल देत जाणें. सालदरसाल नवीन सनदेचा उजूर न करणें. या सनदेची प्रत लेहून घेऊन हें पत्र भोगवटियास परतोन देणें. जाणिजे. चं॥ १

साबान निदेश समक्ष.

 122 2

[१२०]                                                                       श्री.                                                               

श्रीमत परमहंस स्वामी यांहीं त्रिवर्गास आज्ञा केली येशीजे. जोगसालवी याजबरोबर साकर वजन खंडी icon 1१। icon 1२ सवामण दोन शेर पाठविली आहे. तुह्मी पाठविलीत त्यांतून वजन icon 1icon 1१॥ दीडशेर ठेऊन उरली पाठविली आहे ती ठेवणें. पानभारे घरास काय लागतील ते घेऊन ठेवणे. बहुत काय लिहिणे हे आज्ञा. महाग असले तरी घेतां अनमान न करणें. कवलाखाली घालणें, धुळी वारे याचें जतन करणे. बहुत काय लिहिणे, हे आज्ञा. तिघां मुलांस एका रुपयाची द्राक्षे घेऊन देणें. खाले न पाठविणें. आमच्या चित्तास येईल तेथें पाण्याखाले बाग नेमावणें आणि माळशेणींही दोनशे आळी भाजून ठेवणे. बहुत काय लिहिणें हे आज्ञा.




[१२१]                                                                       श्री. 

राजमान्य राजश्री यादो गोपाळ यास आज्ञा केली ऐसीजे. तुह्मीं विनंती पत्र पाठविले ते प्रविष्ट होऊन लेखनार्थ श्रवण झाला. सारांश अक्कलकोटकर देशमुख याजकडे आपले मागावयाचा ऐवज होता याबद्दल आज्ञा घेऊन इकडे आलो. यत्नेंकरून शिध्दशेट देशमुख याशीं जरबेंत आणून त्याचेच - रुजवातीनें हिशेब बहुत झाला. ह्याप्रमाणें द्यावयास अनुकूल नाहीं. सबब सर्व ऐकून रोकड ऐवज माल सव्वीस हजार पाचशें सव्वा चोवीस होता. त्याचा कदबा हुजूरचे नांवे वतनाचे अडीनें लेहोन घेतला आहे ह्मणून लिहिलें. ऐशियाशी तुह्मी जाऊन साहस करून कदबा घेतला ही गोष्ट उत्तम केली. या उपरी त्यांनी तहाप्रमाणें निर्गम केला तरी बरेंच आहे. न करीत तर शब्दाप्रमाणें ऐवज तुह्मांस पोहोंचला. पैकी कुलदेवडूनयाचें वतन सरकारांत ठेविले आहें. अत:पर तुह्मी तेथें न रहाता ऐवज उगवून सत्वर स्वामिसन्निध येणें. यावयास दिरंग न करणें. जाणिजे. चं ॥ १९ रबिलाकर.

सुदन असा.

[११९]                                                                      श्रीभार्गवराम.                                                               

पु॥ त्रिवर्गास आज्ञा येशीजे भेलसईचें व नेवासेयाचे चाकर इमारतीकडे असेत त्यांस, अडीच रुपयाचे असतील त्यांस जाफा पावला करणें. पावणे तीचे असतील त्यांस जास्ती चव्वल करणें. जे कार्याचे नसतील त्यांस न देणें. जगंनाथास निपिटी गूळ मण icon 1२ दोन मण व तुह्मास गूळ icon 1३ मण, व खडे .. दहा मण पाठविली असे ती त्रिवर्ग वाटून घेणें. घरें लौकर बांधणें. कारखाना गोठणें यास पाठविणें. सरकारचे घर राहिलें तरी कामास येईल. आपली घरें आधी करून घेणें. हे लोक चाकर लबाड आहेत. चाकरी करावयाची असती तर घरे मागेंच झाली असती आणि आपले कामावर जाते. हे तुह्मांस मानीत नसतील तर याचे कामकाज धोंडोपंत व बापूजीपंत घेतील. तुह्मी आपले भोळे असा. साकर आहे ती तुह्मांस खाववेल ती खाणें. राहील ती बरण्या भरून ठेवणें. दोन कुतरे पाळा. दरवाज्यावर राखण माणूस ठेवण्यास पाठवितों. कळलें पाहिजे. बहुत काय लिहिणे हे आज्ञा. मीठ दाभोळी, खायाचे कुडो तांदूळ दिवाण पायलीने कुडो करडे कुडो. ०।१।४ सडीक आहे. मसूर १३। वरंगल सडीक, येक कुडो. येणेप्रमाणें पाठविले असे. पेंड बापूजीपंतास icon 1३॥ व धोंडोपंतास icon 1३॥ बाकी तीन मण चिमणाजीपंतास कोठीपैकीं पाठविली असे. येणेप्रमाणें देणें हे आज्ञा. गूळ येणेप्रमाणे वांटणी.

बापूजीपंत धोंडोपंत अंताजीपंत चिमणाजीपंत
icon 1 icon 1 icon 1 icon 1


बाकी गूळ मण .. राहिला तो मुंजीस माहादूचे मुलाची मुंजीस ठेवणें.

[११८]                                                                      श्रीभार्गवराम.                                                               

श्रीमत् परमहंस स्वामी यांही चिरंजीव बापू व चिमणाजी व धोंडू यांशीं आज्ञा केली येशीजे. सभा शिंदे यांही साडेतीनशें वासे मोरणीवर टाकिले आहेत. तर धावडशीस तुह्मांजवळ लोक आहेत; व इकडून तिथे पाठविले. चार गांवची माणसें व गोठणें याचा कारखाना. ऐसे लावून मोरणीवरील वासे नेववणें, व इंदुलीस मागें आमचे लोकांही सातशे वांसे तोडिले तेही नेवणें. घरास पाया घालून बारेचे उत्तरे इमारतीची घरें बांधणे. नाहींतर तुह्मावर कोप होईल. ताम्राची धामधूम फार असली तर, बरें येकादे स्थल बांके पाहून तेथें तुह्मी राहणें, व वस्त तेथें आणणे. खंडू तुमचे हाताखालें आहे. आमचे नांवें पत्र लेहोन त्याजवळ श्रीचा प्रसाद नारळ २ देऊन त्याकडेस पाठऊन कौल आणवणें. डोंगरें तोडिली असतील, त्यांतून लांकूड बरें आणवणें. घरें इमारतीची उत्तम, पुढें मागें नांव राहेसारिखें काम करणें. नाहीतर कोप होईल. हे आज्ञा. जिन्नस पाठविला असे तपशील.

प्याला बाळास डब्या गूल


येणेंप्रमाणें भायाजी असगणकर याजबरोबर पाठविला असे. तो घेणे. हे आज्ञा.

[११७]                                                                      श्री.                                                                  १७१८.                                             

त्रिवर्गास आज्ञा केली येशीजे. श्रीस्थळीहून दोरखडें सुमार २९ येकूणतीस व फाणस अकरा पाठविले आहेत. कान्होजी आंग्रे व ते आले तर त्यांचे भेटीस जगंनाथ व चिमणाजी व उभयतां दोन रुपये भेट ठेवणें; व गवाची कणीक येका मणाची करून भेटीस जाणें. नवे चाकर ठेऊन पाठविले आहेत. त्यांस मुशारा महिना रुपये सव्वादोन असामीस, दोघास ४॥, येणेप्रमाणें शिरस्तेप्रमाणें गल्ला नकद भरून देत जाणें. नावनिशी रामजी भुवडस यास पावले रुपया, १ येक व धोंडजी माहडीक यास पावले रुपया १ येक येकूण दोन पावले आहेत. जाणिजे. चिमणाजीचे आरकाचे तांदूळ icon 1३।४ येकूण तीन कुडव व तीन पाइली पाठविले असेत. नागोजी साळी याजकडील धोतरजोडा १ येकूण किंमत रुपये १॥। पावणे दोन, पातळ १ येक, किंमत रुपया १।, येणेप्रमाणें पाठविली आहेत. मध घागर येक पाठविली आहे. ठेवणें. बहुत काय लिहिणे. आज्ञा.

[११६]                                                                      श्रीभार्गवराम.                                                                                                                 

श्रीमत् परमहंस स्वामी यांही चिरंजीव चिमणाजी व उभयतां यांशीं आज्ञा केली ऐशीजे :- लिहिले कीं कारखानाचे लोक डोईस शेर बकशीस मागत तर न देणें.गाठणेयास त्यांही हसके खादले; व नानाप्रकारचे अन्याय बदमामला देखील केले. व यांचें कामकाज कोणें घेतलें आहे, असे असून आह्मी चालवीत असतां, आह्मांस अडवितात कीं, काय तर यांचा लेखा काय आहे ? गल्ला मागतील तर त्याचे महिन्याचे अडीसरींत देणें. रुसकत द्याल तरी आमचे जात नाहीं. तुह्मी ती गावीचे वठे आणून बरोबर धाडणे. बापूजीपंतास आज्ञा कीं महादुचे पुत्राचा व्रतबंध करणें. सामुग्री पाहिजे ती पाठवून देतों. धोंडोपंतास तुपाची घागर पाठवून देऊन केले पाहिजे. भात करण्यास हांडा पाठवावा ह्मणून लिहिलें. हांडा पाठवितों. कोकंबसालें व चिंच कोठें ठेविलीं आहेत देणें. बापूजीपंतास तुपाची घागर उत्तम तूप पाठविले आहे. घागर त्याची त्यास देणें. हे आज्ञा.

[११५]                                                                        श्री. मार्तंडाचा भंडार.                                                   १४ मार्च १७०२.                                                              

राजीनामा शके १६२३ वृषानाम संवत्सरे शिमगा वद्य ८ वार मंगळवार ते दिवशी बिहुजूर नागोजी पाटील मोकदम मौजे सुरगांव त॥ रांजणगांव सरकार जुन्नर सुहुरसन ११११ या विद्यमान वि॥

वृत्तिकार

भिवाजी पाटील, संभाजी पा।, फिरंगोजी पा।, काननाक महार, कान्होजी पाटील, राणोजी चेगळ, सुभानजी पोवार, माणीकनाक, महार.

सदरहू जण मौजें पिंपरी ता। कडेपठार प्रां। पुणें राजीना लेहून दिल्हा ऐसाजे. कान्होजी पाटील याचा बाप फत्ते जाला त्या तागाईत देशावर पोट भरून राहत होता. त्यास दरम्यान दोन च्यार वरीस पांढरी वैराण पडली. हल्लीं पिरातीचा कौल गावांस झाला. त्यास दोघे चौघे जे भाऊ होते ते गांवास गेले; आणि कान्होजी पाटील याशी नेवावयासी स्थळमजकुरीस आलों त्यावर कान्होजी पाटील बोलिला कीं आपण परकी, आपली घरठिकाणा पांढरीत, काळी जिराईत व बागाईत हाद महमूद पडवळें ठाऊक नाहींत. आपण येऊन काय करावें? त्यास सदरहू जण पांढरी मिळोन भिवजी पाटील यांचे माथा श्री चा देऊन एकवीस बापाचे व एकवीस मायेचे ऐसे बेताळीस पूर्वजाचे सुकृत माथा घालून भिवजी पाटील जिराईत व बागाईत व महादेवपाशील वावरांतून वाहो. आंबे याची हाद मोहमूदपेडवळे सांगीतलें. तेथून कान्होजी पाटील याणें सुखें खाणें. आपण तेणें प्रो चालू सदरहू जण भिवजी पाटील याचे केळे मोडून तरी गुन्हेगार, आपला कुलस्वामी ही खराब करील, व आपले सप्तपूर्वज अधोगतीस जातील. व दिवाणाची गुन्हेगारी देऊ. व कान्होजी प॥ याचे अपनाचा जाब करूं. राजीनामा लेहून दिल्हा सही.
नि॥ नांगर
बि॥ रामजी गोविंद मौजें सुरगांव.
गोही
हरड.
शिवजी प॥
बिरादर मोकदम मौजें भिंगर.

[११४]                                                                             श्रीभार्गवराम.                                                             १७२८.            
                                                           

श्रीमत् परमहंस स्वामी याहीं सहश्रायू चिरंजीव धोंडोपंत यासी आज्ञा केली येशीजे :- तुह्मीं लिहिले रूपा महारास रजा दिली आहे. खालीं खस्त असेल तर चहूं रोजांहीं महार पाठवून देणें. हाल्ली न लिहिलें तर चार दिवस जाल्यावर महार पाठवून देऊ. पुढे धावडशीची पाहणी करणें. माणसांबरोबर जिन्नस पाठविला आहे. बितपशील सरकारच्या बरण्या दोन, साखर भरून बरणी, एक रिती, आलें, बरणी एक, तुमच्या घरच्या बाजा दोन, घरच्या तुमच्या घागरी दोन, तूप १, तेल घागर १, येणेप्रणे जिन्नस पाठविला आहे. तो घेणें व तुह्मी खालीं न येणें. याल तर आमच्या पायाची शपत आहे. तुह्मांस जे लागेल तें पाठवून देऊं. घर बांधण्याविशी चिंता कराल तर शिवार वासे पाठवितों. काहीं चिंता न करणें. तुह्मी तिघेजण कारकून परम आमचा आत्मा आहा. सूज्ञापती
बहुत काय लिहिणें. हे आज्ञा.

[११३]                                                                             श्री.                                                              १० जानेवारी १७३६            
                                                           
श्रीमत् महाराज श्री परमहंस बावा स्वामीचे सेवेशी.

चरणरज बापूजी गणेश चरणावर मस्तक ठेऊन शिरस॥ नमस्कार. विनंति. येथील वर्तमान:- छ ७ रमजान परियंत यथास्थित असे विशेष. स्वामीचें आज्ञापत्र आले कीं र॥ भिकाजी नाईक रास्ते याजकडील कुल हिशेब करून व्याजसुध्दा हिशेब करून घेऊ. अनन करशील तर शपथ असे, ह्मणून आज्ञा केली तर खत पाहून द्यावें. त्यांही छ मजकुरी दिले तर खत पाठवावें. जो हिशेब खतांत असेल तो असे. तें पाहून घ शु॥ अष्टमी परियंत होईल तें व्याज घेऊन सेवेशी श्रुत होणे, हे विज्ञापना. स्वामीस जे ह्मैस दुभते याशी दिली त्याची वाट मृत्यु पावली. हाती लागतां कठीण गोष्ट आहे. स्वामी रागास वाटींकरिता येतील, तर आपला इलाज होता तितका केला. परंतु इलाज नाही.
सेवेशी श्रुत होणें. हे विज्ञापना.

[११२]                                                                             श्री.                                                              ११ सप्टेंबर १७३०             
                                                                   
 112 1


आज सरसुभा प्रं॥ जाउली व व्याघ्रगड त॥ मोकदनी मौजें साहळी १, मौजें धनकवडी १, मौजे वेळें १, संहुर सन इहिदे सलासीन मया अलफ. श्रीमंत यांची गुरें वीस चरावयास, तीन गावांस हशीलशिवाय चारतील. त्यास तुह्मी अडथळा न करणें. तीन गावाच्या शिवारांत चारणीस येतील. शिवार चारू देणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. जाणिजे. छ ९ रविलावल.

                                                                                                                                                                           112 2

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries