Super User

Super User

श्री.

लेखांक ३९.

१७०६ आषाढ वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे:- येथील प्रकार तरी : हिंदुस्थान नि:क्षत्री जालें. शीख आहेत त्यांत फूट आहे. कोणी कोणाचे स्वाधीन नाहीं. दबाब पडल्यास जमीदारी करावयासही लागतील. जेर-जबरदस्तीनें पे॥ तरी लुटीत फिरत आहेत. हें शिखाचें वर्तमान आहे. वजिराचा प्रकार म्हणावा तर इंग्रजांवर त्याची दौलत आहे. त्यास सापत्य इंग्रजांचा प्रकार हलका दिसतो. विष्टिन विलाइतीस गेला. त्याचे बदली बडे साहेब ह्मणोन आले आहेत. याचा बंदोबस्त विष्टिनाप्रोंनाहीं. वख्त नेकही पूर्ववत्प्रो॥ नाहीं. परंतु पहिली फरपट चालत आली आहे त्याजप्रों कारभार चालतो व पातशहाचा प्रकार ह्मणावा तरी, येक लाख तीस हजार रु।। दरमहाचा चाकर आहे. तितका पैका अक्षत मरीट मिळाला ह्मणजे त्यास एका गांवासीं व बिघाभर जमिनीसीं गरज नाहीं. याप्रों हिंदुस्थानची अवस्था आहे. त्यास, अवघे हिंदुस्थानचे बंदोबस्ताचा वोझ येकल्या राजश्री पाटीलबावावर आहे. जितका बंदोबस्त यांचे जिवेंकरून नीतीनें कर्णें तो केला आहे व करावयाचा तो करितात. परंतु यांचे पदरीं कोणी मनुष्य नाहीं कीं, यांचे सरदारीचा सरदारांतून मुलकी बंदोबस्त करून, पैका उत्पन्न करून, दौलत सांभाळी ऐसा मनुष्य नाहीं. याजकरितां स्वामीस सूचनार्थ विनंति लि॥ आहे. जो प्रकार दृष्टीनें पाहिला आणि प्रतियास आला, तो जाणोन विनंति लिहिली आहे. पुढें उत्तम जाणतील ते करणार स्वामी समर्थ आहेत. बहुत काय लि।। ? कृपा केली पो. हे विनंति.

श्री.

लेखांक ३८.

१७०६ आषाढ वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे:- महाराव निंबाळकर याची स्त्री आनंदीबाई राजश्री पाटीलबावाची बहीण याजसमागमें नवाब निजाम-अल्लीखान यांजला खिलत, वस्त्रें सात, पारचे, व हत्ती-घोडा, व मोत्याची माळ व शिरपेंच व झगा बमय परगीरी व तरवार व ढाल येणेंप्रमाणें पातशाकडून राजश्री पाटीलबावांनीं रवाना केलें आहे. स्वामीस श्रुत होय. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.

श्री.

लेखांक ३७.

१७०६ आषाढ वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे:- राजश्री पाटीलबावानीं आपलेकडून खिलत वस्त्रें रवाना केली बितपशील:-

१ मंजूर- अल्लीखान नाजर यासी दिल्लीस पाठविली. साता पारच्यांची खिलत, वस्त्रें, मोत्याची कंठी व जगा शिरपेंच व हत्ती, व घोडा व तरवार येणेंप्रमाणें.
१ सीतलदास मारनिलेचा पेषकार. त्यासी पाचा पारच्यांची खिलत व जगा व शिरपेंच येणेंप्रमाणें.
१ हसन-रजाखान वजिराचा कारभारी. यासी पाचा पारचांची खिलत, वस्त्रें, व जगा, व शिरपेंच, येणेंप्रमाणें.
१ हैदर-बेगखान वजिराचा मुत्खियार. यासी सातां पारच्यांची खिलत व जगा, शिरपेंच, येणेंप्रमाणें.
१ राजश्री सदाशिवपंत बक्षी पाटीलबावाकडील वकील. यासी पाचा पारच्यांची खिलत, वस्त्रे व जगा शिरपेंच, येणेंप्रमाणें.
५ एकूण पाच खिलत रवाना केले आहेत. व या दिवसांत हापडसाहेब इंग्रेज, पारमरसाहेबाचा बदली, होवून मेघफासनसाहेब याजकडून कलकत्त्याहून लखनऊस आला आहे म्हणून वर्तमान आहे. पुढें विशेष वर्तमान ऐकिल्यास विनंति लिहूं. बहुत काय लिहिणें ? कृपा केली पाहिजे. हे विनंति.

श्री.

लेखांक ३६.

१७०६ आषाढ वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसिजे :- वाट-साहेब इंग्रजानें हैदरनाइकाचे पुत्राकडील मामला तीन कोडीवर फैसल करू मदराजचे किल्याची लढाई महकुब करविली. व मुलूक हैदरनायकाचे पुत्राने घेतला आहे तो याजकडे बदस्तूर बाहाल असावा याप्रमाणें फैसला करून, मदराज किल्यांतून कलकत्त्यास आला. मेघफाससाहेब यास फोडून वर्तमान सांगितलें. त्यांणीं उत्तर दिल्हें कीं, जे सर्वांचे मनास कबसलियांचे मनास आली ते गोष्ट आह्मांस मान्य आहे. हैदरनाइकाचे पुत्रासी सलूक कर्णेच योग्य आहे, ह्मणोन बोलण्यांत आलें आहे. व महंमद अल्लीखान, आरकाटचा सुभा, याचें पत्र कलकत्त्यास मेघफाससाहेबास आलें कीं, फौजेची व खर्चाची खबर घषता तरी हा सलूक रहातो, नाहीं तरी हैदरनाइकाचे पुत्र आल्यावर गालबा आहे, या दिवसांत खबर घेणें योग्य आहे. ह्मणोन लि॥ आहे. याप्रमाणें वर्तमान लेख लिहून आले त्याजवरून विनंति लि। आहे. बहुत काय लि।।? कृपा केली पाहिजे. हे विनंति.

सेवेसी विनंति शेवक शंकराजी सखदेव कृतानेक सां नमस्कार विज्ञापना. लिहिलें परिसोन कृपा करणार स्वामी समर्थ आहेत. हे विज्ञप्ती.

श्री.

लेखांक ३५.

१७०६ आषाढ वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे:- पातशहास मिरज्या सफीखान यांणीं विनंति केली कीं, आपण खासा स्वारी अगरियाकडे चालावें. त्यास पातशहांनीं उत्तर केलें कीं, तुह्मी एकांतएक नाहींत, या तुचे भरवशावर निघोन येखादी मसलत करून फजीत व्हावें कीं काय ? त्याजवरून रदबदली होता सिलेमासको पातशाजाद्यासमागमें द्यावें, असें ठरलें. तेव्हां पातशाहा ह्मणून लागले कीं, मसी तुह्मी अंतर करू नयें. त्यांस मर्जासफीखान व अफरा-शाहाखान व अबदुल अमदाखान व जेनुल-अहदीखान व मेहेदी-कुलीखान कुराणावर मोहोरा करून दिधल्या कीं, आम्ही हजरतीशीं अंतर करणार नाहीं. त्याचे कुराणावर पातशांनीं मोहर केली कीं, आह्मी अंतर करणार नाहीं. याप्रों परस्परें शफत प्रमाण होवून शाहाजाद्यास समागमें घेऊन गेलें. याचें कारण कीं, पातशहा सोडून दूर गेल्यावर पातशहानें दक्षण्यांसी किंवा इंग्रजांसी किंवा शिखासी जाबसाल लावूं नये. कोणाकडून आमचें पारपत्य करील ह्मणोन त्यांचे मनांत शंवशव येऊन, पातशाहाजादा आपले हातीं असावा व महंमदबेग हमदानी व राव राजा प्रतापसिंग जैपुरकर वगैरे किरकोळी राजेरजवाडे कोणी मानितात नाहींत. याजकरितां तारा समागमें असलियास सर्व आदब करून ताबेदारी करतील, हे जाणोन पातशाहाजाद्यास समागमें घेऊन गेले आहेत. आग्नियास गेलियावर महमद-बेगानें ताबेदारी केली तरी उत्तम, नाहीं तरी त्याचे पारपात्य करावें, हा एक विच्यार. व तो ताबेदारी होवून यांचे आज्ञेनरूप असल्यास, राजश्री पाटीलबावाची फौज हलकी असलियास, राव याजकडील जाबसाल लागलाच आहे. त्याप्रों राव यास सामील होवून पाटिलासी बिघाड करावा, हा एक विचार. जर पाटीलबावाची फौज भारी असली व न तोले, तरी त्याचे व पाटील याचे मध्यस्तींत पडून त्याचा यांचा सलोख करून देऊन ग्वालेरीचा किला व पहिला करार आहे. त्याप्रों मुलुक पंचमहाल वगैरे राजश्री पाटीलबावास देऊन, त्यासुधां अंतर्वेदींत उतरून, पूर्वेस लखणऊकडे चाल करावी. हा एक विचार व कोणासीही बिघाड न करितां यंदाचे साल अग्नियाचे किल्याचा व मुलुकाचा बंदोबस्त व सर्व सेवक आज्ञेंत येऊन व आपले घर रक्षून असावें. हाही एक येक विचार. असे च्यार विचार आपलें घरांत हामसिरा बेगम व घरचे कारभारी शिवराम वगैरेही ठरावून, येथून कूच करून, तोफखाना व फौजेसुद्धां गेले आहेत. त्यास, अग्नियास गेलियावर कोणती गोष्टींतून दरपेश येईल व काय मसलत करतील तें प्रत्ययास आल्यावर विनंती लिहूं. व श्रीमंतसाहेबास व आपल्यास खलितें पत्रें स्नेहवृद्धीचे नबाब अफराशाबखान यांणीं लि। आहेत. याची उत्तरें आपणही कृपा करून स्नेह-वृद्धीची पाठवावीं. बहुत काय लि ? कृपा केली पो. हे विनंति.

श्री.

लेखांक ३४.

१७०६ श्रावण वद्य ११.

श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी :-
विनंति सेवक गोविंदराव पुरुषोत्तम कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील कुशल ता। छ २४ माहे जाखर मुक्काम भीमथुरा जाणोन स्वानंदें लेखनाज्ञा केली पाहिजे. विशेष. पूर्वी छ १७ जमादिलावलीं इकडील सविस्तर वृत्त विज्ञापना लिहिली होती. त्यावरून श्रुत जालेंच असेल. हालीं इकडील वर्तमान सविस्तर राजश्री नानाचे पत्रीं विनंति लि॥ आहे त्यावरून ध्यानास होईल. बहुत काय लिहिणें कृपा केली पाहिजे हे विज्ञप्ती. पै॥ छ २८ रजब सन खमस समानीन ज्येष्ठ मास.

श्रीवरद.

लेखांक ३३.

१७०३ श्रावण वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंतिपत्रीं आज्ञा कीं : सरकारांतून उमदा सरदार बमय फौज पातशहाचे हुजुरांत येऊन पातशहांनीं व सरकारचे फौजेनें मिळून अंतर्वेद, बंगाला वगैरे मोहीम मातबर करावी, ऐसे होतें. परंतु प्रस्तुत बरसात दोन चार महिने राहिली आणि इंग्रजी पलटण जमा होवून शिकरीवर आली, त्याची तंबी करणें प्राप्त आहे, याकरितां राजश्री महादजी शिंदे व शिवाजी विठ्ठल मातबर फौजेनसी इंग्रजी पलटणाचे पारपत्यास गेले आहेत. या समयांत पातशहाची हुजूर फौज दहा- बारा हजार बमय सरंजाम जंगी व एक सरदार बावकुफ याजप्रों रा। महादजी शिंदे यांजकडे येऊन मारनिले यांनीं व त्यांनीं मिळून शिकरीवर पलटणें आलीं आहेत त्यांचें पारपत्य करावें. बरसातीस चार महिने अवकाश आहे, याजसंबंधें या पलटणाचें पारपत्य करून गारत करावें, हें नेकसलाह. याजकरितां तुह्मी पातशहास व नजबखानास मसलतीचें मार्ग बोलोन, फौज इंग्रजांचे पारपत्यास लवकर ये, ऐसें करावें. बरसात जालियावर मातबर बसलत करावी. तूर्त बरसातीस थोडे दिवस राहिलिया हें काम करावें. येणेंकरून फार चांगलें आहे. म्हणून पत्रीं आज्ञा. त्यास आज्ञेप्रों पातशहास व नबाब नजबखानास समजावून उत्तेजन बहुत प्रकारें दिल्हें कीं, तुह्मी श्रीमंतास पत्रें लिहीत गेला व आह्माकडून लिहवीत गेला, आतां तुमचे लिहिलेप्रों रा। पाटीलबावा आले आहेत; त्यांचे शामील आपली फौज पाठवावी. यांनीं उत्तर केलें कीं, उगेंच आह्मास कशास लाजवितां, आह्मांपासी फौज आहे ती शिखाकडे अटकली आहे तिकडून रिकामी जालियावर श्रीमंताचे मनोदयानरूप अमलांत येईल. म्हणून बोलतात. अनुभवास येईल तो मागाहून विनंति लिहूं. इंग्रेजाकडील रु।। घेऊन त्यास शामील न जाले ते एक पातशहाचे भयानें व स्वामीचे सेवेंत वचनीं गुंतले आहेत, त्या शरमेनें आजवर राखिले आहेत. पुढें सेवकाचा पाय येथें ठरणें कठिण जालें व याजला त्याचें आश्वासन वरचेवर येतच आहेत. ते बातनी ठेवून वारंवार यासी अर्ज करितों कीं पागोटियाची आबरू सोडून टोपी घालाल तर पुर्ती टोपी बसेल. तुचे नसीबानें जुंज लागलें, नाहीं तर आजपावेतों दिल्लीत अंमल करते, आतां आपला नक्षा राखणें तर राजश्री महादजी शिंदे यांस शामील होणें, नाहीं तर आतां कळीच दाखवून पुढें ग्रास करतील तेव्हां पस्ताव कराल व आमचें बोलणें स्मराल, ते न करणें. असें प्रांत:काळ सायंकाळ नित्यानित्य तऱ्हेतऱ्हेची ममता दृढ करून उत्तेजन देत आहो. पुढें अंमलात येईल तें विनंति लिहूं. ईश्वर सत्वर शत्रूचा नाश करो व स्वामीचा प्रताप अधिकोत्तर होई ते सुघडी. कृपा केली पाहिजे. हे विनंति.

श्रीवरद.

लेखांक ३२.

१७०३ श्रावण वद्य ११.

पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे. राजश्री बाळाजी गोविंद यांजकडून विसा हजारांचे जागिरीचे कमतिचें ऐवजीं रुपये दहा हजार देविले. त्यास लिहितां व कारकून पाठवितां थकलों. परंतु कवडी खर्च न पाठवीत. यास्तव येथून उलगडा पाडून स्वामीपासीं येणें दुस्तर जालें आहे. आपण कृपा करून त्यांचे वकिलास तेथेंच ताकीद होऊन रुाा घेऊन पाठवाल तर जीवनोपाय. होईल तें करणार स्वामी समर्थ आहेत. व राजश्री रघुनाथ हरि यांजकडून सालाबाद पांचा हजारांचे नेमणुकीचे रुाा xxxxx यांनीं या ऐवजास गांव लावून दिल्हे होते त्या xxx नें वसूल होत होते. ते घेऊन आजपावेतों सरकारांत विनंती न केली. हाली मारनिलेनीं गांव जप्त केले. त्यावरून सरकारांत विनंति लिहिली. सरकारांतून मारनिलेचें नांवें ताकीदपत्र आलें तें त्यांजकडे पाठविलें. त्यांनीं साफ उत्तर दिल्हे कीं, झांसी तालुक्यापैकीं परगणे राा पाटीलबावाकडे गेले, आता राहिला मुलूक तो आह्मास किल्ल्याचे खर्चासच पुरत नाहीं तेव्हां सरकारच्या नेमणुका आह्मीं कोठून द्याव्या ? याविषईंची पत्रें हुजुरांतून पाठविलीं आहेत. तेथें xxxx नेमणूक करार होऊन येईल त्याप्रों xxxx धातुपोषणाची बोलणीं बोलून आमचे कारकुनास व माणसास बिदा करून दिधले. त्यास, या दिवसांत बुंदेले व झांसीकर आपणास जसे अवघे राजेरजवाडे तैसे आपण आपल्याच मोजितात व नानाप्रकारें वल्गना करितात. त्याचा तपसील पत्रीं काय ल्याहावा ? तर कृपा करून बुंदेल्याकडील व झांसीकराकडील हजूरचे बंदोबस्त करून ऐवज घेऊन शेवकास पाठवितील तर येथील गुंता उरकोन. चरणदर्शन-लाभ घडेल ते करणार आनाथाचे नाथ आपण आहेत. कृपा करून उत्तरीं पालन करावयास स्वामी समर्थ आहेत. दर्शन-लाभ होय तो सुदिन. हे विनंति.

श्री.

लेखांक ३१.

१७०३ श्रावण वद्य ११.

नवाब नजबखान बाहादूर हे हालीं याप्रमाणें कौल लिहून देऊं ह्मणतात, त्याची नकल :-

१ मेरट वगैरे महाल व इटावा वगैरे माहाल व कडाकुरा कदीम पातशाही भोजनखर्च व तोफखाना वगैरेचा तनखा आहे तें बदस्तूर आम्हांकडे असावें.
१ बंगाला वगैरे मुलूक कदीम पातशाही आहेत. दुशमनाकडून काढून बदस्तूर आम्हाकडे असावा. 
१ सहारणपूर वगैरे मुलूक बदस्तूर आम्हाकडे असावा. 
१ सिपारस जाटाची न करावी. 
१ सुबे इलाहाबाद आमचा आहे तो बदस्तूर आम्हाकडे असावा. 
१ नबाब वजिरांनीं मुलूक हालीं घेतला आहे व कदीम आहे तो नबाब वजिराकडे असावा. 
१ अहमदखान बंगश याचा मुलूक वजिरांनीं घेतला आहे. बंगश माराचा पुत्र चाकरीस हजर जहालियासी पातशाही बंदा आहे. वजिराची खातरदास्त त्याचा प्रांत सोडावा. 
१ शिखांकडील मुलूख आमचा व तुमचा फौजेचे इतफाकानें हस्तगत होईल त्यांत निम्मे हिस्सा वांटून घेऊं. 
१ ग्वालेरचा मुलूक इंग्रजांनीं घेतला आहे. त्यास, ग्वालेर किल्ला पातशाही आहे. तो बदस्तूर पेषकेष हजूरची करावी. 
१ राजे जैपूर व राजे मारवाड कदीम बंदे पातशाही आहेत. हाली हजूर चाकरीस हजीर जाहालियासी आपले कदीम मुलकावर सरफराज राहातील. जर बागी होतील तर त्यांची तंबी करूं. जैरपूरचा मामला आह्मांकडे असावा व मारवाडचा मामला आपणांकडे असावा. 
१ इंग्रजांनीं दक्षणचा मुलूक हालीं घेतला आहे व कदीम आहे त्यांत निम्मे वांटून घ्यावा. श्रीमंत राजश्री पंतप्रधान साहेबांचे खातरदास्त सुभेदारी श्रीमंत पंतप्रधानसाहेबाची असावी.
१ सुभे अजमेर आपणांकडे असावा.
१ जो तुमचा मित्र तो आमचा मित्र, तुमचा शत्रू तो आमचा शत्रू, त्याची तंबी करावयासी अंतर करूं तर शफत असे.
१ राजे गोहदकडील व आणिक तिकडील मुलूक तरवारेचे जोरानें हस्तगत होईल. जर तिकडील राजे हजर जहालियासी मामला आह्मांकडे असावा. बागी जहालियास तंबी करून निम्मे मुलूक वांटून घेऊं. उमराव राजे तालुक्यांत शाहाचे बंदर्गीत हजर होतील, त्यांसी न बोलावें व अमुल हुकमी केलियास त्यांचे तंबीस शामील राहूं.
१ मुलुख कालपी व झांसी आपणाकडे असावे.
१ कोणी आमचा चाकर उठोन तुह्मांकडे जाईल त्यास तुह्मी चाकर न ठेवावा व तुमचा चाकर आह्मांकडे येईल तरी आह्मी चाकर ठेवणार नाहीं. 
१ तूर्त तुह्मांस मोहीम रुबकर आहे. त्यास, हुजूरचे फौजा व खर्चास तुह्मीं द्यावें. पुढें हे करार असे कीं, आमची फौज तुमचे कुमकेस जाईल तरी तुह्मीं खर्चास द्यावें. तुमची फौज आमचे कुमकेस आली तर आह्मी खर्चास द्यावें.

छ २३ जमादिलाखर संवत् १८३८ सन २२ पातशाही.

श्री.

लेखांक ३०.

१७०३ श्रावण वद्य ११.

नवाब नजबखान बाहादूर याजकडून पूर्वी कौलनामा लिहून घेतला आहे. त्याची नकल.

श्रीमंत पंतप्रधानसाहेबासी व आम्हासी दोस्ती व इरबात कदीम आहे, त्यांत किमपि अंतर नाहीं, ह्मणोन दुहराऊन कौलकरार दिनइमानची शपतपूर्वक लिहितों कीं, तुमचा मित्र तो आमचा मित्र, तुमचा शत्रू तो आमचा शत्रू व आजपर्यंत जो मुलूक आमचे व आपल्या कबज्यांत आहे, त्यांत खलश रतीभर न व्हावा.*

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries