Super User

Super User

पत्रांक ५०

पो आषाढ शुा ६ सोमवार
श्रीशंकर १६९० आषाढ शुा ५

वेदशास्त्रसंपन्न राजश्री बाळकृष्ण दीक्षित स्वामीचे सेवेसी:-

विद्यार्थी कृष्णराव बल्लाळ सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता छ ३ सफर मुा माडवे येथें आपले कृपेंकरून सुखरूप असों. विशेष. कृपा करून पत्र पाठविलें तें पावलें. इकडील वर्तमानः श्रीमंत राजश्री पंत प्रधान यांच्या व श्रीमंत राजश्री दादासाहेबांच्या भेटी जाहल्या. मजल दर मजल पुणियास जात आहेत. दादासाहेबांनीं त्रिंबक व धोडप वगैरे किल्ले होते त्यांच्या चिट्या दिल्या. किल्ले हस्तगत व्हावयाकरितां रा रामचंद्र गणेश व रा विसाजी कृष्ण उभयतां दोन हजार फौज घेऊन मदनेस्वरचें नांदूर येथें राहिले आहेत. किल्ले हस्तगत होऊन लवकरच पुणियास येतील. श्रीमंतांस पत्र पा होतें. त्याचें उत्तर पाठविलें आहे- ऐवज पोहोंचेल. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दिजे. हे विनंति.

पत्रांक ४९

श्री.
पा जेष्ठ वद्य ३० मंगळवार.
१६९० ज्येष्ठ वद्य १३

वेदशास्त्रसंपन्न राजश्री कृष्णराव दिक्षित स्वामचे शेवेसीः-

विद्यार्थी बाळकृष्ण बल्लाळ मा नमस्कार विनंति उपरी येथील वर्तमान ता छ २६ मोहरम मुा धोडप सुखरूप असों. विशेष. छ. २४ मीनहूस श्रीमंतांची फौज मुक्काम मजकुरीं तयार होऊन उभी होती. तों राजश्री गोपाळराव गोविंद यांची फौज पुढें आली होती. गांठ पडोन फौज मोडोन पलोन गेली. श्रीमंताचे हत्ती अकरा व सदाशीव रामचंद्र यांचे हत्ती च्यार व अवधूतराव केशव याचा हत्ती एक वगैरे किरकोळ मिळोन, अठरा वास हत्ती व तमाम तोफखाना पाडाव करून घेतला. पांच सातशें उंट, च्यार पांचशें घोडीं, डेरे, दांडे कुल लुटून गेले. श्रीमंत दादासाहेब धोडपचे माचीस गेले. चिंतो विठ्ठल जखम होऊन पाडाव आला. त्यांचा भाऊ मोरो विठ्ठल ठार जाहला. आज छ २६ मीनहूस किल्याभोंवत्या फौजा उतरल्या आहेत. तो सरंजाम माफकच आहे. पहावें, आपणास कळावें ह्मणोन लिहिले आहे. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दिजे. हे विनंति.

पत्रांक ४८.

पो जेष्ठ वद्य ७ मंगळवार.
श्रीशंकर
१६९० ज्येष्ठ वद्य ५

वेदशास्त्रसंपन्न राजश्री बाळकृष्ण. दिक्षित स्वामीचे सेवेसीः-

विद्यार्थी कृष्णराव बल्लाळ कृतानेक सा नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें विशेष. कृपा करून पत्र पा तें पावलें. गंगातीरीं मुकाम किती होणार, हें ल्याहावें ह्मणोन लिा. त्यास, अद्याप कूच्य मुकामाचा निश्चय ठरला नाहीं. परंतु बहुतकरून कूच्यच होईल. मुकाम व्हावयाचें कारण नाहीं. आपणास कळावें ह्मणोन लिा आहे. श्रीमंत राजश्री दादासाहेब चांदवडाहून कूच जाहल्याचें वर्तमान आलें नाहीं. आज सायंकाळ पो येईल, श्रीमंताचे कुच पुणतांबियाचेच रोखें होईल, युद्ध-प्र- संग संभव आहे, ऐसें दिसोन येतें. पहावें. ईश्वर इच्छा प्रमाण ! बहुत कार्य लिहिणे ? 'लोभ असों दिजे. हे विनंति.

पत्रांक ४७.

पो जेष्ठ वद्य ५ शनीवार
श्रीशंकर
१६९० ज्येष्ठ वद्य २

वेदशास्त्रसंपन्न राजश्री बाळकृष्ण दीक्षित स्वामीचे सेवेसीः-

विद्यार्थी कृष्णराव बल्लाळ कृतानेक सां विनंति उपरी येथील कुशल ता जेष्ठ वद्य २ पावेतों आपले कृपेंकरून सुखरूप असों. विशेष. कृपा करून पत्र पार तें पावलें. रा सदाशीव रामचंद्र याची बातनी व राजाराम पंत यांचे वर्तमान कळलें व श्रीमंतांस आपण पत्र लिहिलें होतें त्याचें उत्तर घेऊन पा आहे. आपण लिहिले की, आह्मांस विचार काय लिा तो लिहावा. त्यास आपण उभय पक्षीं मान्य. कोणी कडूनही उपसर्ग लागणार नाहीं स्वस्थ असावें. आज श्रीमंताचा मुकाम घांटावर आहे. उदईक कूच करून घांटाखालीं वोकरी इतकें पाणी पाहून मुकाम होईल. लौकरीच गंगेवर टोकें तीन कोस पूर्वेस टाकून मुकाम होणार आहे. तेव्हां आपणासहि विदित होईल. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दिजे. हे विनंति.

पत्रांक ४६.

श्री.
१६९० चैत्र शुद्ध ११
( नकल बमोजिब अस्सल. )

अज सरकार राजश्री गंगाधर यशवंत, दिम्त राजश्री तुकोजी, होळकर सुभेदार, ता तुळाजी पाटील मोकदम मौजे हस्त पोखरी, परगणे आंबड सुा समान सितैन मया व अलफ. राजश्री सटवाजी गायकवाड व वासुदेव संभाजी यांच्या अमलांत सन ११७३ मध्यें ज्याहानखान्यांत व मोसम कलाल वगैरे का मजकूर यांची चोरी झाली. त्याचा ऐवज नगदी-यांत तहकीक करून सटवाजी गायकवाड यांचे विद्यमानें सरकारांत घेतला. तुह्मांकडे कलाल मजकूर याचा कझ्या राहिला नाहीं. तुह्मीं मौजे मजकुरीं आपली खासर जमा राखून, मौजे मजकूरचे कीर्द आबादी करून, सुखरूप राहणें. कलाल मजकूर कोणेविशीं कथळा करील तर त्यास सरकारांतून ताकीद केली जाईल. जाणिजे. छ, ९ जिल्काद.

पत्रांक ४५.

श्री
१६८९ माघ शुद्ध १३
नकल

राजश्री गोविंदराव कृष्ण, कादार पा शाहाजांपूर, गोसावी यांसीः-

अखंडित लक्ष्मी राजमान्य स्नो महादजी शिंदे दंडवत. सुा समान सितैन मया व अलफ. तुह्मांकडून पेस्तर सालचे ऐवजीं खरेदी कापड गुा अबाजी नाईक कांबरस व रामचंद्र नाईक परांजपे, साहुकार पुणेकर, रदकर्ज रुो ७५००० पाऊण लाख रुपये देविले असेत. तरी पा मजकूरचे ऐवजीं रसदेच्या भरण्याबा ऐवज श्रावण मासीं पावता करून कबज घेणें. दुस-या वराता तुह्मांवर जालियास हा ऐवज अगोदर देऊन मग दुसरी वराताचा ऐवज देणें. जाणिजे. छ १० माहे रमजान. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. सदरहू ऐवज वायद्याप्रमाणें पुण्यास पावता करूं. हे विनंति.
सदरहू वरात तुको शामजी याजबा पाठविली असे.

पत्रांक ४४

श्री.
१६८८ आश्विन शुद्ध ७

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री नरसिंगराव जनार्दन गोसावी यांसीः-

सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार, सुा सबा सीतैन मया वे अलफ. तुमचें प्रयोजन असे. तरी देखत पत्र विजयादशमीस हुजूर येणें. दिरंग एक घडीचा न लावणें. सत्वर येणें. जाणिजे छ ५ जमादिलावल. बहुत काय लिहिणें. लेखन सीमां.

पत्रांक ४३

श्री.
१६८८ भाद्रपद शुद्ध ७

चिरंजीव राजश्री राव यांसी रघुनाथ बाजीराव आशीर्वाद. उरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. श्री गोकर्ण महाबळेश्वर व श्री स्वामी कार्तिक यांचे पुजानैवेद्यास वगैरे खचीस पांच हजार होनाचे गांव द्यावे ऐसा हैदर नाईक यांणी पेशजी करार केला होता. परंतु त्यांणीं कराराप्रमाणें गांव दिले नाहींत. पांच हजार रुपयाचें मात्र गांव, इकडून रा रघुनाथ शामजी कारकून पाठविले आहेत, त्याचे स्वाधीन केले, ह्मणोन कळोन आलें, ऐशियास, आपण हैदर नाईकास पत्रें पाठवन कराराप्रमाणें पांच हजार होनाचे गांव कारकुनाचे स्वाधीन करीत तें करावें. येविसीं ताकीदपत्रें लागतील तीं वो रा व्यंकटशास्त्री यांस द्यावीं. रा छ ६ रबिलाखर, बहुत काय लिहिणें ? हे आशीर्वाद.

                                                                             लेखांक ३४१

                                                                                                                                                       १६०७ ज्येष्ठ वद्य २    
राजश्री बाजी सर्जाराऊ देसमुख ता। रोहिडखोरे गोसावी यासि

5 अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रीा बाजी घोलप हवालदार व कारकून किले पुरंधर जोहार अनेक आसिर्वाद सु॥ साब समानीन अलफ पत्र पाठविले पाऊन वर्तमान कलो आले लिहिले की आपल्यास बहुत च फार अटक केली होती त्यास हुनरे च बाहेर पडिले आता काय विचार करावा तो लिहिला पाहिजे ह्मणौनु लिहिले कळो आले उत्तम गोष्टी बरी च केली आता राजश्री छत्रपतिस्वामीचे भेटीस जाउनु आपले उर्जित करून घेतले पाहिजे राजश्री              चे दरशण होता च बरीच सरजमी होईल जाणिजे येविशई बहुत लिहिणे तरी विवेकी असा कृपा असो दिल्ही पाहिजे रा। छ १५ रजबू हे विनती 

 

                                                                                                                                            68 2                                      326

पत्रांक ४२.

श्री
१६८८ भाद्रपद शुद्ध ६

शिका नक्कल.

नल, इ मा अनाम देशमुख व देशपांडे, प्रो पडदूर, सरकार जालनापूर, यांसीः-
माधवराव बल्लाळ प्रधान, सुा सबा सितैन मया व अलफ. प्रो मजकूर येथील देहे,

१ मौजे सुगाणे                     १ मौजे तरवडे            १ मौजे वरफळ
१ मौजे लिखितदरी               १ मौजे वैजोडें            १ मौजे लिगसे
१ मौजे पाकणी शरामत         १ मौजे टाकळी          १ मौजे शिराळे
१ मौजे गेवराई                     १ मौजे डोलार           १ मौजे कर्जखेडे
१ मौजे गुळखेडे                   १ मौजे सृष्टी              १ मौजे देवळे
९ मौजे कोटाची सळई           १ मौजे खडेले           १ मौजे कोळोलदेवरुख
१ मौजे वडसी                       १ मौजे खांडरी          १ मौजे मंगरुळ
१ मौजे आगलगांव                 १ मौजे म्हसले           १ मौजे चाकी
१ मौजे रायपूर                       १ मौजे पांडोरे          १ मौजे केदारवाडी
१ मौजे बावई                         १ मौजे थरीठाणे       १ मौजे ठाणे
१ मौजे देरनाबाद                    १ पिंपळखेडें

येकूण ३२ गांव मुकासा व बाबती व सरदेशमुखी व इनामगांव व जमिनी खेरीज करून जहागिरीचा अंमल नरसिंगराव जनार्दन धायगुडे यांजकडे फौजेचे सरंजामास सालमजकूरपासून करार करून दिला असे. तरी सदरहू ३२ गांवचा जहागिरीचा अंमल मशारनिल्हेशीं रुजू होऊन सुरळीत देणें जाणिजे. या छ. ५ रबिलाखर आज्ञा प्रमाण.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries