Super User

Super User

लेखांक १३१                                                                                                                                  १५९५ अधिक भाद्रपद वद्य १२

                                                   63           137

                                                                                        (फारसी मजकूर)

अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी कसबा पा। मजकूर सु॥सन अर्बा सबैन अलफ बा। मा। ना। पैकी बदल खा। नकद व कोलिसे जमा माहालानिहाय होनु ५305 पाच बि॥

खा। नकद जमा                    खा। कोलिले जमा
जिरातखाना होनु ४                कुर्ण ई॥ होनु १305

येणेप्रमाणे देविले असे आदा कीजे मोर्तब सूद

                                                                    72 1

तेरीख २५                            माहे जमादिलोवल
जमादिलोवल                                              बार रु

श्री.
चैत्र शु. १२ बुधवार शके १७१५
.
विनंति विज्ञापना. सिकंदर ज्याहा साहेब यांचे पादी संबंघाने यांनी पत्रे पाठविण्याची योजना केली--

१२ पुणियास----------------------------
१ सरकारीत.
१ दौलतराव सिंदे.                १ नाना.
१ आबा चिटणीस,                १ हरिपंततात्या,
१ कल्याणराव कवडे,           १ आपा बळवंत.
                                       १ अंबाबाई कल्याणराव यांची.
                                           स्त्री व बायाबाई कन्या ये॥ २
१ गोविंदराव भगवंत.
१ बाबाराव गोविंद.
१ रघतम हैबतराव
---------------------
१२

३ नागपुरास---------------------------------
१ रघोजी भोंसले सेनासाहेब सुभा.
१ भवानी काळो.
१ आनंदराव नरसिंव्ह,
----


६ इंग्रजांस...............
१ मिस्तर ज्यानर जनरल कलकत्तेकर,
३ पहिले वकील येथे होते त्यांस,

१ मिस्तर हालन,
१ मिस्तर ज्यानसेन.
१ मिस्तर किनवी दिलावरजंग.
----


१ चैनापटणचे गौरनरास.
----

१ महमद अली वालाज्याहा बाहादुर यस ,
४ टिपुकडे -------------------

१ टिपु सुलतान '
२ त्यांचे पुत्र दोघे चेनापटण येथे त्यांस.

१ गुलामअली.
१ रजाली,
------

याप्रा। पत्रे तयार करविली. पो कांहीं रखाना जाली व होणार. याशिवाय करनुळकर आदिकरुन सर्वांस षादीस येण्याची पत्रे सिद्ध करविली आहेत. ।। छ, १० पाबीन हे विज्ञापना.

श्री.
फाल्गुन शु. १२ गुरुवार शके १७१५ ता. १३ मार्च १७९४.

विनंती विज्ञानपा. नवाब जनवाड्याहून कुच करुन छ, ११ साबानीं बैदर येथील मंगळवार पेठेत येणार. कारखान्यास तमाम हुकुम जाला षादीचा समारंभ होणे त्यास जागा प्रशस्त पाहिजे. बेदरचे किल्यांत पहिले नवाब होते ते जागा अडचणीची, व जनवाडा येथे केवल संचित, जाणून मंगळवार पेठ येथील झाडुन लोकांची घरे खाली करऊन नक्षा करुन राज्याजींनी आणोन दाखविला. नागझरी पाटी घेऊन भेवता बाडा दीड कोस देन कोस पर्यंत बसउन बंदोबस्त करविला. साहेब जादे यांची यादी रमजानचे महिन्यांत व्हावी, अद्याप षवाल! अद्याप मुकरर जालें नाहीं. परंतु तयारी सरंजामाची व्याबज्या ताकिदी करुन होत आहे. मंगळवार पेटेंत नवाब आल्यानंतर काही दिवस राहुन बारोंचीस जाण्याचाही बेत भाहे. तेथील पैर षिकार करुन फिरून मंगळवार पेठेत येणार. तदनंतर पादीची शुरुवात, यैसेही आहे. होईल त्याप्रा विनंती लिहिण्यांत येईल. नवाब बोलले की ' मंगळवार पेठेत तुमचे येथे आह्मीं राहावयास येतो'. मी उत्तर केले की आम्ही राहतो तेथे आपण येऊन षादी करतात वाजपेक्षा अधिक काय आहे ! ज्या जाग्याचे नसीब थोर म्हणोन हजरतीचे मनांत आलें. हे बोलणे यैकुन संतोष मानला. राजे रायेरायां यांस सांगि. तले की किल्यांतील हवेल्या यांस राहावयास खाली करुन द्याव्या. त्याजवरुन देशपांडे आदिकरून मुलें माणसे काढावयाचा झिकर. ती जागा पाहावयास मी गेले होते. देशपांडे यांचे वरचे पैनास मनुष्य कुटुंबाचे आहे. बायका पेरें येकच कलकलाट जाला. त्यांनी निघोन दुसरें ठिकाणी राहावें तर बर्यिकीपेरें आणि असबाब कोठे ठेवावा? ठिकाणा नाहीं ! सरकारची तर सख्ती! तेव्हा त्या देशपांडे यांचे मी समाधान केले. त्यांचे दुःख पाहावेना ! बाहेर येक आंबराई पाहून डेरे देऊन तेथे राहिलो. नवाबांनी सांगून पाठविलें कीं घरांत जाऊन राहिला की नाही ? जर नाही ह्मणावे तर वाईट मानतील की * आह्मीं मंगळवारांत यांचे जाग्यावर राहिले हे वाईट वाटलं, याजकरितां बाहेर राहिलें.' यास्तव सांगोन पाठविले की त्या जाग्यांत पडझड फोर जाली. मरमत करावयाची, तृर्त तयार होण्यास चार दिवस लागतील. याजकरिता भामराईत राहिले. याप्रा गरीबगुरबा यांस अतिशय उपद्रव! लिहिण्यांत किती ल्याहावे ? समा जाली ! छ १० षाबीन हे विज्ञापना,

श्री.
फाल्गुन शु. १२ गुरुवार शके १७१५ ता. १३ मार्च १७९४.

विनंती विज्ञापना. दैवलाचे बोलण्यात आले की • सिकंदर ज्याहा बाहदुर साहेबजादे यांचे घादीस श्रीमंतांचे येणे व्हावें येविष हाजरतींनी श्रीमंतास पत्र लिा आहे. त्यास त्यांचे येणे घडावें हें यैन सलाह आहे. येण्यास कांह। अनमान करतील की काय ? म्हणोन विच्यारिलें. मी उत्तर केलें कीं * दोन्हीं सरकारची वाहदायस्त व येकदिल, त्या अर्थी अनमान कशाकरितां व्हावा ! मगर कांही अडचण असल्यास नकळे.' दैाला बोलले की ‘टिपु. व इंग्रज या दोन दालतदारासी सलूख व फजल इलाही घरचाही बंदोबस्त खातरख कोणतीही अडचण नाहीं. अशा प्रसंगी श्रीमंतांचे येणे होऊन परस्परें मुलाकात व घादीचा समारंभ. यांत हाजरतीची चित्तापासोन खषी, व सर्वांत चांगले दिसेल. पत्रे रवाना होतात व तुम्हीही हा मा श्रीमंतांस ल्याहावा. षादीस येण्याची इतला लौकर व्हावी. हजरत इंतजारी करतात. याप्रों दौलाचे बोलण्यांत आलें. र॥ छ. १० षाबान हे विज्ञापना.

श्री.
फाल्गुन शु. १२ गुरुवार शके १७१५ ता. १३ मार्च १२९४.

विनती विज्ञापना. नवाबांनी बोलण्यांत आणिलें की * सिकंदर ज्याही बाहादूर यांचा प्रादी करण्याचा निश्चय जाला. त्यास या पादीचे समारंभांत राव पंत प्रधान यांनी येण्याची यैनसलाह आहे. रात्र पंत प्रधान यांस पाहावे हैं बहुत दिवसांपासुन आमची खाहेब आहे, त्या गोष्टीचा इत्यफाक या वादीचे खुषीचे समारंभांत घडावा हैं फार चांगले पैसे समजोन राव पंत प्रधान यांस आह्मीं पत्र या मुकदम्याविषई तयार करविलें खाना होत आहे. तुत्व हे मरातब मुफसल लेहुन त्याचे येण्याची इतला लौकर करावी. दोन्ही रियासतीं पुस्तैन पासान येक जुदाई नाही. त्या अर्थी राव पंत प्रधान यांनी अनमान न कारतां षादीस जातीने यावे हे त्यांस लाजम आहे. याप्रा। बोलण्यात आले. या प्रकण पत्रे यांनी राजश्री रघोत्तम राव यांजकडे रवाना केली आहेत. त्यास विनंती की येविषीं बोलण्याचा प्रकार आज्ञा येईल त्या मी बोलण्यात येईल. 'आपले सरदार व मुतसदी सुधां येऊन लग्नाची शोभा करावी' ह्मणेन हौसेने सांगुन बोललें की याचे उत्तर लौकर आणवावे. तेपर्यंत पोदीची तारीख मुकरार करीत नाहीं. च्यार दिवस पाद लांबवावयास येईल. चिंता नाहीं. येण्यास फार दिवस लागतील, आणि शाद तर लैकर होणार' असे कदाचित ह्मणतील तर त्यांचे येण्याचा सुमार पाहुन मग तारीख ठरण्यात येईल. पंत प्रधान यांचे येण्यांत दोन खुब्या. येक तर, जन्म त्यांचा जाला त्या दिवसांपासोन त्यांस पाहावें ही उत्कंठा. दुस, त्यांचे षादीस सिकंदर ज्याहा गेले; यांचे प्रादास राव पंत प्रधान आले. ६ दौलतीची असी वाहदीयेत याचा लौकिक दिगांत होईल. विलायेत पर्यंत सर्व दौलतदारांनी आश्चर्य मानावे, ही दुसरी खुवी, यास्तव येणें व्हावे, याची इंतजारी आहे. याप्राा तावर लिहुन लौकर उत्तर आणव म्हणौन सांगितले, त्याजवरुन लिा आहे. सदरहुचा जबाब विस्तारै करुन यावा. त्या अन्वयें यांसी बोलण्यात येईल. ॥ छ, १० षाबान है। विज्ञापना,

श्री.
फाल्गुन शु. १२ गुरुवार शके १७१५ ता. १३ मार्च १७९४

श्रीमंत रावसाहेब यांस मामुली हवाल्याचे पत्र.

विनंती विज्ञापना, छ. २ साबान बुधवारी रात्री दौलांकडे मी सरकारचे थैलीपत्र सिंदे प्रकर्मी नव.बाम आलें ते द्याव पाकरितां गेलो. मीर आलमही होते. मी आल्याची इतला दौलांनी नवाबास अजी पाठविली. त्याजवर दसे. खत होऊन आले की बरामद जाल्यानंतर फलाण्यास आह्मांकडे पाठवणे. नवाब बरामद होऊन चोपदार येतांच मी नवाबांकडे गेलो. जात समई दौला बोलले की हाजरतापासीं जाऊन तथुन फिरोन मजकडे आपण यावे. नत्राबांकडे गेलो दरबार जाला होता. नाचही होत होता. सिकंदर ज्याहा साहेब जाद यांचे षादी चा निश्चय जाल्याच्या नजरांही लोकांनी केल्या. सरकारचे थैलीपत्र नवाबांस प्रविष्ट केले त्याजवर नवाबाचे बोलण्यात आल्याची ता विनंति अलाहिदा पुखणी पत्रीं लिया आहे त्यावरुन ध्यानात येईल, । छ. १ ०बाबान. हे विज्ञापना. 

लेखांक १३०                                                                                                                                  १५९३ कार्तिक शुध्द १५

                                                   63           137

                                                                                        (फारसी मजकूर)

अज दिवाण पा। वाई ताहा मोकदमानी देहाय

मौजे पसर्णी सा। हवेली                                मौजे वोझर्डे सा। हवेली पा। मा।
मौजे एकसर सा। मुर्‍हे

पा। मजकूर सु॥सन इसने सबैन अलफ दरवज बदल इनाम बो। नारायणभट बिन गोपीनाथभट चित्राउ जुनारदार सो। का। मजकूर यास इनाम जमीन चावर १।२ सवा चावर दोनी बिघे दर सवाद दुदेह पा। मजकूर

मौजे पसर्णी सा। हवेली चावर ..                  मौजे वोझर्डे सा। हवेली चावर ..
मौजे एकसर सा। मुर्‍हे बिघे .।२

येणेप्रमाणे दो। माहसूल व नखतयाती बाजे उजुहाती बा। खु॥ वजीर मुकासाइयानी माजी व खुर्दखत साबीका हाली कारकीर्दी छ १ माहे मोहरम पो। छ २४ मिनहू दर साल सन तिसा सितैन अलफ सादर जाहाले तेणेप्रमाणे भोगवटा मिसेली ठाणा दर साल छ १५ रजबू चालिले आसेल तेणेप्रमाणे सन तल मजकुरास अवलाद व अफवाद चालवीजे तालीक लेहून घेऊन असल परतून दीजे मोर्तब सूद

                                                                                                                 72 1

तेरीख १३                         माहे रजब
जमादिलाखर                                   बार

                    

श्री.
फाल्गुन शु. ६ शुक्रवार शके १७१५ ता. ७ मार्च १७९४.

ता छ. २६ माहे रजब ते छ, ४ सावान पावेतों मामुली अखबार. या अखबारांत विशेष महत्त्वाचा मजकुर नाहीं मागे आलेल्या शादीचा थोडासा उल्लेख आहे. सं. 

                                                                  छ १० साबानीं डांकेवर.

श्री.
फाल्गुन शु. ६ शुक्रवार शके १७१५ ता. ७ मार्च १७९४.

विनंती विज्ञापना. चेनापटणाहुन व्यंकट रामदीक यांजकडील अकबरा दोन आल्या. त्या रवाना केल्या आहेत. राजश्री गोविंदराव भगवंत सेवेसीं प्रविष्ट करितील. अवलोकने मार ध्यानात येईल. उत्तरा विषई आज्ञा जाली पाहिजे, रा छ ४ पाबान हे विज्ञापना.

श्री.
फाल्गुन शु. ६ शुक्रवार शके १७१५ ता. ७ मार्च १७९४,

विनंति. करनुल संस्थानचा अधिकार अलफखान याजकडे जाला. त्याजकडुन रणदुलाखान येथे येऊन करनुलास गेल्यानंतर अलफखान व रणदु लाखान या उभयताचे वयमनस्य येऊन सांप्रत रणदुलाखान व अकबर अलीखां ह्मणोन रणमस्त खानापासुन मातबर त्याचे सलाह मसहलतींत होता त्यास व मुस्तफांखान यां त्रिवर्गास अलफखानानी कैद केले. लोकांस नित्य उपद्र(व) तालुक्याची खराबी, कुणी चांगला राहिला त्यास नागवणे. याप्रमाणे जालमी व जलालीची चाल अलफखानाची ऐसें वर्तमान नवाबांकडे आले, सा छ, ४ पाबान हे विज्ञापना. 

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries